शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीच्या जोरावर आधुनिक शेती

By admin | Updated: May 11, 2016 00:45 IST

निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे

खोडद : निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील अवधूत दत्तात्रय बारवे व अभिजित दत्तात्रय बारवे या बंधूंनी तीन एकर क्षेत्रात तैवान पपईचे सेंद्रिय पद्धतीने भरघोस पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या तीन एकरपैकी एक एकर क्षेत्रात पपई व डाळिंब अशी दोन्ही पिके एकत्रित घेतली आहेत.अवधूत व अभिजित बारवे यांनी तैवान पपईची एक एकरात ११०० रोपांची अशी तीन एकर क्षेत्रात ३ हजार ३०० रोपे १० महिन्यांपूर्वी लावली होती. सध्या पपईच्या फळांची तोडणी सुरू आहे. तीन एकर क्षेत्रात ६ फूट बाय ५ फूट अशा अंतरावर बेडवर ही लागवड केली आहे. मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर केला आहे. सुरुवातीला बेसल डोस दिला असून, अन्य कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. तीन एकर क्षेत्रात २ ट्रक शेणखत टाकले आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला सुमारे ३० ते ४० किलो माल निघतो, तर रासायनिक पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला ७० ते ८० किलो माल निघतो. सेंद्रिय पपईला किलोला २५ ते २६ रुपये बाजारभाव मिळतो, तर सेंद्रिय पपईला किलोला १५ ते १६ रुपये बाजारभाव मिळतो.‘पपईच्या रोपांची खरेदी, शेणखत, बेसल, ठिबक, मल्चिंग पेपर आणि मजुरी असा मिळून एकरी ८८ हजार रुपये खर्च आला आहे. रोपांची लागवड केल्यापासून १० महिन्यांत फळे तोडणीसाठी येतात. एवढ्याच क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर केला असता तर सुमारे २३० टन माल निघाला. मात्र, पूर्ण क्षेत्रात सेंद्रिय पद्धत वापरल्यामुळे सुमारे ९० टन माल निघणार आहे.