शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

मोबाईलने मेंदू केला ‘आळशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ व्हायचा किंवा वहीत नोंदवला जायचा; पण मोबाईल आल्यापासून लक्षात ठेवण्याची सवय कमी होऊ लागली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आबालवृद्धांचा मेंदू आळशी होतोय का? मोबाइलची इतकी सवय झाली आहे की कुणी क्रमांक सांगितला तर ‘थांबा, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो. नंतर मला आठवणार नाही,’ असे म्हटले जाते. मोबाईलच्या आहारी गेल्याने मेंदूतली साठवणीची प्रक्रियाच मंदावली आहे. हा भविष्यासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे सांगणे आहे.

पूर्वी कॅलक्युेलटर (गणकयंत्र) आले आणि पाढे पाठ करण्याचा विसर पडला. लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं इतिहासजमा झाली. आता मोबाईलमुळे असेच काहीसे होणार असल्याची चिन्हे आहेत.

आजमितीला मोबाईल हा अनेकांच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. पाढे पाठ करणे, त्यावर आधारित गणिताची आकडेवारी करणे या गोष्टी मोबाईलने संपवल्या आहेत. एखाद्या गणिताची आकडेमोड करताना मुले मोबाईलचा आधार घेतात. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असल्याचे दिसून येते. जे मोबाइलचा वापर करीत नाहीत त्यांची आकलनक्षमताही अधिक चांगली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चौकट

जिवंत स्मृतींची साथ सुटतेय?

“मोबाईलमुळे यंत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतीमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार लोक घेऊ लागले आहेत. स्मृती जिवंत आहे, मोबाईल ‘मटेरिअल’ आहे. आपली स्वत:ची जिवंत स्मृती सोडून मनुष्य यंत्राने साठवलेल्या स्मृतीवर विसंबून राहू लागला आहे. हे धोक्याचे आणि तोट्याचे लक्षण आहे. यातून माणूस आपले अपरिमित नुकसान करून घेत आहे.”

- डॉ. उल्हास लुकतुके, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत चालली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हे देखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही. कुठलीही गोष्ट गुगलवर शोधायची सवय मुलांना झालीय याची खंत वाटते.”

- ॠता वाटवे, पालक

चौकट

“वयोमानापरत्वे स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते; पण मोबाईलमुळे ती अधिक क्षीण होते. आपण नैसर्गिकपणे काही गोष्टी स्मृतीमध्ये साठवू शकतो. मग यंत्राची गरज काय? डायरीमध्ये क्रमांक लिहून ठेवण्याची सवय अजूनही जपली आहे. मोबाईल फारसा वापरत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती आजही चांगली आहे. वयोमानामुळे क्रमांक तोंडपाठ नसले तरी पूर्वीच्या खूप गोष्टी आजही आठवतात.”

-केशव वाटवे, ज्येष्ठ नागरिक (वय ७० वर्षे)

चौकट

मोबाईलची फार सवय नाही

“शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करतो. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक्त मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.”

- सिद्धांत देव, विद्यार्थी (वर्ग पाचवी)