शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने मेंदू केला ‘आळशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ व्हायचा किंवा वहीत नोंदवला जायचा; पण मोबाईल आल्यापासून लक्षात ठेवण्याची सवय कमी होऊ लागली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आबालवृद्धांचा मेंदू आळशी होतोय का? मोबाइलची इतकी सवय झाली आहे की कुणी क्रमांक सांगितला तर ‘थांबा, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो. नंतर मला आठवणार नाही,’ असे म्हटले जाते. मोबाईलच्या आहारी गेल्याने मेंदूतली साठवणीची प्रक्रियाच मंदावली आहे. हा भविष्यासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे सांगणे आहे.

पूर्वी कॅलक्युेलटर (गणकयंत्र) आले आणि पाढे पाठ करण्याचा विसर पडला. लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं इतिहासजमा झाली. आता मोबाईलमुळे असेच काहीसे होणार असल्याची चिन्हे आहेत.

आजमितीला मोबाईल हा अनेकांच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. पाढे पाठ करणे, त्यावर आधारित गणिताची आकडेवारी करणे या गोष्टी मोबाईलने संपवल्या आहेत. एखाद्या गणिताची आकडेमोड करताना मुले मोबाईलचा आधार घेतात. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असल्याचे दिसून येते. जे मोबाइलचा वापर करीत नाहीत त्यांची आकलनक्षमताही अधिक चांगली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चौकट

जिवंत स्मृतींची साथ सुटतेय?

“मोबाईलमुळे यंत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतीमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार लोक घेऊ लागले आहेत. स्मृती जिवंत आहे, मोबाईल ‘मटेरिअल’ आहे. आपली स्वत:ची जिवंत स्मृती सोडून मनुष्य यंत्राने साठवलेल्या स्मृतीवर विसंबून राहू लागला आहे. हे धोक्याचे आणि तोट्याचे लक्षण आहे. यातून माणूस आपले अपरिमित नुकसान करून घेत आहे.”

- डॉ. उल्हास लुकतुके, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत चालली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हे देखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही. कुठलीही गोष्ट गुगलवर शोधायची सवय मुलांना झालीय याची खंत वाटते.”

- ॠता वाटवे, पालक

चौकट

“वयोमानापरत्वे स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते; पण मोबाईलमुळे ती अधिक क्षीण होते. आपण नैसर्गिकपणे काही गोष्टी स्मृतीमध्ये साठवू शकतो. मग यंत्राची गरज काय? डायरीमध्ये क्रमांक लिहून ठेवण्याची सवय अजूनही जपली आहे. मोबाईल फारसा वापरत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती आजही चांगली आहे. वयोमानामुळे क्रमांक तोंडपाठ नसले तरी पूर्वीच्या खूप गोष्टी आजही आठवतात.”

-केशव वाटवे, ज्येष्ठ नागरिक (वय ७० वर्षे)

चौकट

मोबाईलची फार सवय नाही

“शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करतो. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक्त मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.”

- सिद्धांत देव, विद्यार्थी (वर्ग पाचवी)