शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

मोबाईलने मेंदू केला ‘आळशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एक काळ असा होता की, कुणी एखादा क्रमांक सांगितला तर तो लगेच मेंदूत ‘फिक्स’ व्हायचा किंवा वहीत नोंदवला जायचा; पण मोबाईल आल्यापासून लक्षात ठेवण्याची सवय कमी होऊ लागली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आबालवृद्धांचा मेंदू आळशी होतोय का? मोबाइलची इतकी सवय झाली आहे की कुणी क्रमांक सांगितला तर ‘थांबा, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो. नंतर मला आठवणार नाही,’ असे म्हटले जाते. मोबाईलच्या आहारी गेल्याने मेंदूतली साठवणीची प्रक्रियाच मंदावली आहे. हा भविष्यासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे सांगणे आहे.

पूर्वी कॅलक्युेलटर (गणकयंत्र) आले आणि पाढे पाठ करण्याचा विसर पडला. लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं इतिहासजमा झाली. आता मोबाईलमुळे असेच काहीसे होणार असल्याची चिन्हे आहेत.

आजमितीला मोबाईल हा अनेकांच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. पाढे पाठ करणे, त्यावर आधारित गणिताची आकडेवारी करणे या गोष्टी मोबाईलने संपवल्या आहेत. एखाद्या गणिताची आकडेमोड करताना मुले मोबाईलचा आधार घेतात. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असल्याचे दिसून येते. जे मोबाइलचा वापर करीत नाहीत त्यांची आकलनक्षमताही अधिक चांगली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चौकट

जिवंत स्मृतींची साथ सुटतेय?

“मोबाईलमुळे यंत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतीमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार लोक घेऊ लागले आहेत. स्मृती जिवंत आहे, मोबाईल ‘मटेरिअल’ आहे. आपली स्वत:ची जिवंत स्मृती सोडून मनुष्य यंत्राने साठवलेल्या स्मृतीवर विसंबून राहू लागला आहे. हे धोक्याचे आणि तोट्याचे लक्षण आहे. यातून माणूस आपले अपरिमित नुकसान करून घेत आहे.”

- डॉ. उल्हास लुकतुके, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत चालली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हे देखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही. कुठलीही गोष्ट गुगलवर शोधायची सवय मुलांना झालीय याची खंत वाटते.”

- ॠता वाटवे, पालक

चौकट

“वयोमानापरत्वे स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते; पण मोबाईलमुळे ती अधिक क्षीण होते. आपण नैसर्गिकपणे काही गोष्टी स्मृतीमध्ये साठवू शकतो. मग यंत्राची गरज काय? डायरीमध्ये क्रमांक लिहून ठेवण्याची सवय अजूनही जपली आहे. मोबाईल फारसा वापरत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती आजही चांगली आहे. वयोमानामुळे क्रमांक तोंडपाठ नसले तरी पूर्वीच्या खूप गोष्टी आजही आठवतात.”

-केशव वाटवे, ज्येष्ठ नागरिक (वय ७० वर्षे)

चौकट

मोबाईलची फार सवय नाही

“शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करतो. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक्त मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.”

- सिद्धांत देव, विद्यार्थी (वर्ग पाचवी)