शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळवण्याची आमदार कुल यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी धरण प्रकल्प व कोयना प्रकल्पामुळे नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे सुमारे १०० ...

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी धरण प्रकल्प व कोयना प्रकल्पामुळे नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे सुमारे १०० टीएमसी पाणी कृत्रिमपणे पश्चिमेकडे वळविण्यात आले आहे. नैसर्गिकरित्या पूर्वेकडील असलेले पाणी कृत्रिमपणे पश्चिमेकडे वळविल्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे व नैसर्गिकरित्या पूर्वमुखी असणारे पाणी कमी झाल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. तसेच शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा दूरगामी विपरीत परिणाम झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात पडणारे दुष्काळ ही त्याची परिणिती आहे. १०० वर्षापूर्वी वीज निर्मिती व वीज वहनासाठी घेतलेला निर्णय त्यावेळी योग्य होता, परंतु मागील १०० वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने विज निर्मितीसाठी मोठे बदल झाले असून वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत.तसेच दुसऱ्या बाजूने शेती, वाढते नागरीकरण व औद्योगिकरण यामुळे पाण्याच्या वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्यामुळे एका बाजूने विजेचा वापर वाढत असला तरी, वीजनिर्मितीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने, नॅशनल ग्रीड मुळे देशातून एका भागातून दुसऱ्या भागामध्ये वीजवहन करणे शक्य झाले आहे तर दुसऱ्या बाजूला पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे.

सद्यस्थितीमध्ये नवीन धरणाच्या निर्मितीसाठी जागा मिळणे दुरापास्त असून नवीन धरणे उभारण्यासाठी क्लिष्ट प्रक्रिया, भूसंपादनास नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता उपलब्ध असलेल्या धरणांमधूनच पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा विचार करून, मुळशी व कोयना प्रकल्पाचे पाणी विपुलतेच्या खोऱ्या कडून तुटीच्या खोऱ्याकडे टप्प्याटप्प्याने वळविण्याचे धोरण ठरविण्यासाठी भावे समिती व नंतर सुर्वे समिती स्थापन करण्यात आली. भावे समितीच्या अहवालानंतर सुर्वे समितीचा अहवाल शासनाकडे सादर झालेला नाही, सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर विपुलतेच्या खोऱ्यात कृत्रिम रित्या वळविले पूर्वमुखी पाणी तुटीच्या मूळ प्रवाहाकडे वळवून शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाच्या या विषयी शासन सकारात्मक कार्यवाही करेल असा आशावाद निवेदनातूून व्यक्त केेेला आहे.