शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

राज्याचे मंत्रीच मराठीचे मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:12 IST

पुणे : एखाद्या पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला की आपले मंत्री ताबडतोब हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करतात. महाराष्ट्राचे ...

पुणे : एखाद्या पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला की आपले मंत्री ताबडतोब हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करतात. महाराष्ट्राचे मंत्रीच मराठीचे मारेकरी आहेत, अशी टीका ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केली.

अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथालीचे शिरीष वीरकर, अक्षरधाराचे रमेश व रसिका राठिवडेकर उपस्थित होते.

कर्नाटकचे मंत्री त्यांच्याच भाषेत बोलतात. मात्र, महाराष्ट्रातील मंत्र्यांनाच मराठीचे वावडे आहे, अशी शाब्दिक तोफ डागत ज्यांच्या हातात लेखणी आहे, अशा साहित्यिक व पत्रकारांची जबाबदारी वाढली असून, सांस्कृतिक पडझड थांबविण्याचे काम त्यांनीच केले पाहिजे, असे फुटाणे यांनी सूचित केले.

प्रा. जोशी म्हणाले, राजकारणात हायकमांडचे ऐकावे लागते. नाट्यचित्रपट क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे मत विचारात घावे लागते कवीचे तसे नसते. कविता हीच कवीची सार्वभौम सत्ता असते. ग्लॅमरच्या विश्वात राहूनही प्राजक्ता माळी यांना कवितेचे बोट धरावेसे वाटते ही महत्वाची गोष्ट आहे.

प्राजक्ता हिने पुण्यात प्रकाशन समारंभ होत असल्याचा आनंद व्यक्त करत तिला कविता कशा सुचल्या व आलेल्या अनुभवातून त्या कशा लिहिल्या गेल्या हे मनोगतात व्यक्त केले. रसिका राठिवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आर. जे. शोनाली हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

फोटो - प्राजक्ता माळी