: आंब्याचे वळण येथे झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माळशेज घाटात आंब्याचे वळण येथे एका मिनीबस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला धडकून अपघात झाला. या घटनेत १४ प्रवासी जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रामावतार बाबूलाल शहा (वय ५१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नगरहून प्रवाशांना घेऊन एक मिनीबस कल्याणला जात होती. ही बस माळशेज घाटातील आंब्याचे वळण येथे असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ही मिनीबस येथील रस्त्याच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बस घाटात कोसळली नाही. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला.
सर्व रहिवासी उल्हासनगर जिल्हा ठाणे येथील आहेत. राजेंद्र प्रसाद शहा (वय ६९), सुनीता राजेंद्र शहा (वय ५४), मुन्नी जवाहरलाल शहा (वय ४५), खुशबू अजित शहा (वय ३२), राधा उत्तम शहा (वय ३४), कुसुम रामावतार शहा (वय ४५), संतोष अश्रू नरवडे (वय २१), मनोज प्रसाद शहा (वय ५०), मुरलीप्रसाद रामेश्वर शहा (वय ५०), शारदा मुन्नेश्वर शहा (वय ५०), मुन्नेश्वर शहा (वय ५४), तुन्नी मनोज प्रसाद शहा (वय ४२), कविता मुरलीप्रसाद शहा (वय ४७), उत्तम कुमार शहा (वय ३८) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर आळेफाटा येथे उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याचे समजताच टोकवडा पोलीस ठाण्याचे एपीआय एस. एच. खरमाटे यांच्या नेतृत्वाखाली एच. सी. बढे, पी. के. बगाड, ननवरे , बांगर, डोंगरे मतकर यांनी तत्काळ जखमींना मदत दिली. चालक संतोष नरवडे याच्यावर टोकवडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.