शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

लाखो रुपये पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: March 25, 2017 03:34 IST

डिंभे उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पाणीपट्टी थकली आहे. वसुलीसाठी जलसंपदा विभाग फारसा तगादा लावत

अवसरी : डिंभे उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पाणीपट्टी थकली आहे. वसुलीसाठी जलसंपदा विभाग फारसा तगादा लावत नव्हता; परंतु या वेळी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी शाखाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मचारी आणि शाखाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.डिंंभे उजवा कालव्याचे पाणी वापरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांकडे पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकल्याने पुढील होणारे उन्हाळी आवर्तन होईल किंवा नाही, याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत वारंवार जलसंपदा विभागाने आवाहन करूनही पाणीपट्टीवसुलीबाबत शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. डिंंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील सुमारे ६८ गावांना कालवा सिंचनाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. खरीप आणि रब्बी हंगामातील सुमारे ३५ हजार एकर क्षेत्र बागायती झाले आहे. पाझर तलाव भरत असल्यामुळे परिसरातील विहिरीची भूजलपातळी वाढली आहे. अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उजवा कालव्याचे उपलब्ध पाणी झाल्यामुळे बंद झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊनही पाणीपट्टी भरण्याबाबत मात्र उदासीनता जाणवते. अनेकदा जलसंपदा विभाग तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे-पाटील, कालवा सल्लागार समितीचे सदस्य देवदत्त निकम यांनी वारंवार आवाहन करूनही पाणीपट्टी भरण्याबाबत शेतकरी चालढकल करीत आहेत.उपलब्ध होणारी पाणीपट्टी आणि प्रत्यक्षात पाण्याचे होणारे वाटप यांमध्ये मोठी तफावत आहे. आपल्या गावची थकीत पाणीपट्टी असलेल्या खातेदारांची यादी जाहिरात फलकावर डकविण्यात येणार आहे. संबंधित सर्व थकीत खातेदारांनी आपापली पाणीपट्टी बीटधारकाकडे जमा करावी. पाणीपट्टी पावती आपणास ८ दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९ ते ११ या वेळेत मिळेल, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.विविध गावांत होणाऱ्या ग्रामसभेसाठी शाखाधिकारी वि. बा. हाडवळे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. परंतु, पाणीपट्टीबाबत शेतकऱ्यांनी उदासीन न राहता गांभीर्याने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. (वार्ताहर)