शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

लाखो रुपये पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: March 25, 2017 03:34 IST

डिंभे उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पाणीपट्टी थकली आहे. वसुलीसाठी जलसंपदा विभाग फारसा तगादा लावत

अवसरी : डिंभे उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पाणीपट्टी थकली आहे. वसुलीसाठी जलसंपदा विभाग फारसा तगादा लावत नव्हता; परंतु या वेळी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी शाखाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मचारी आणि शाखाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.डिंंभे उजवा कालव्याचे पाणी वापरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांकडे पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकल्याने पुढील होणारे उन्हाळी आवर्तन होईल किंवा नाही, याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत वारंवार जलसंपदा विभागाने आवाहन करूनही पाणीपट्टीवसुलीबाबत शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. डिंंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील सुमारे ६८ गावांना कालवा सिंचनाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. खरीप आणि रब्बी हंगामातील सुमारे ३५ हजार एकर क्षेत्र बागायती झाले आहे. पाझर तलाव भरत असल्यामुळे परिसरातील विहिरीची भूजलपातळी वाढली आहे. अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उजवा कालव्याचे उपलब्ध पाणी झाल्यामुळे बंद झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊनही पाणीपट्टी भरण्याबाबत मात्र उदासीनता जाणवते. अनेकदा जलसंपदा विभाग तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे-पाटील, कालवा सल्लागार समितीचे सदस्य देवदत्त निकम यांनी वारंवार आवाहन करूनही पाणीपट्टी भरण्याबाबत शेतकरी चालढकल करीत आहेत.उपलब्ध होणारी पाणीपट्टी आणि प्रत्यक्षात पाण्याचे होणारे वाटप यांमध्ये मोठी तफावत आहे. आपल्या गावची थकीत पाणीपट्टी असलेल्या खातेदारांची यादी जाहिरात फलकावर डकविण्यात येणार आहे. संबंधित सर्व थकीत खातेदारांनी आपापली पाणीपट्टी बीटधारकाकडे जमा करावी. पाणीपट्टी पावती आपणास ८ दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९ ते ११ या वेळेत मिळेल, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.विविध गावांत होणाऱ्या ग्रामसभेसाठी शाखाधिकारी वि. बा. हाडवळे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. परंतु, पाणीपट्टीबाबत शेतकऱ्यांनी उदासीन न राहता गांभीर्याने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. (वार्ताहर)