शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला सव्वा कोटीचे पाणी

By admin | Updated: June 3, 2015 04:51 IST

महापालिकेच्या जुनाट पाणी वितरण व्यवस्थेमुळे होणारी ४० टक्के पाण्याची गळती, शहराची अनियंत्रित व नियोजनाचा अभाव असलेली वाढ, अनधिकृत नळजोडांची भरमार

सुनील राऊत, पुणेमहापालिकेच्या जुनाट पाणी वितरण व्यवस्थेमुळे होणारी ४० टक्के पाण्याची गळती, शहराची अनियंत्रित व नियोजनाचा अभाव असलेली वाढ, अनधिकृत नळजोडांची भरमार आणि महापालिकेच्या नाकाखाली होणारी पिण्याच्या पाण्याची राजरोस चोरी यामुळे शहराच्या उशाला असलेली चार धरणे भरूनही गेल्या ८ महिन्यांत पुणेकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये मोजले असल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०१४ ते ३१ मे २०१५ अखेर शहरात तब्बल १ लाख ८८ हजार टँकरच्या फेऱ्या झालेल्या आहेत. शहराचा आकार कपबशीसारखा असल्याने महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत अनेक अडचणी आहेत. त्यातच शहराची वाढ होताना, या वितरण व्यवस्थेबाबत विशेष खबरदारी न घेण्यात आल्याने शहराच्या अनेक भागांत कमी-अधिक दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अर्ध्या शहरास अवघे काही तास, तर अर्ध्या शहरास २४ तास पाणी मिळते. परिणामी कमी दाबाने पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांना वर्षभर पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. भर पावसाळ्यातही शहरात दरमहा ११ ते १२ हजार टँकरची पिण्याची पाण्याची मागणी असते. शहराच्या उशाला खडकवासला प्रकल्पांतर्गत चार धरणे आहेत. या चार धरणांची पाणीसाठवण क्षमता तब्बल ३0 टीएमसी असून, त्यातील जवळपास १६ टीएमसी पाणी पुणे शहरास पिण्यासाठी दिले जाते. मात्र, या पाण्याच्या वितरणाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतो.