शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात दरड कोसळून २०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात दरड कोसळून २०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबातील १५३ जणांचे स्थलांतर पुणे ग्रामीण पोलीस आणि महसूल विभागाने केले. रहिवाशांची शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांकडे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भोजन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वेल्हे तालुक्यातील कर्नवडी गाव महाड तालुक्याच्या हद्दीवर आहे. सह्याद्रीचा कडा उतरून कर्नवडीत जाता येते. वेल्हे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवसांपूर्वी घरांना तडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

वेल्हे तालुक्यातून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जाण्यासाठी दुर्गम भागातून जाणार्‍या शिवकालीन वाटा आहे. कडे-कपारीतून पायपीट करून महाड तालुक्यात उतरता येते. त्यानंतर रविवारी (२५ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास कडा कोसळून मोठा आवाज झाला होता.

वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तहसीलदार शिवाजी शिंदे, केळद गावचे सरपंच रमेश शिंदे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्थलांतराबाबतची विनंती केली. मात्र, ग्रामस्थ स्थलांतरित होत नव्हते. पवार, शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सभापती दिनकर धरपाळे, नाना राऊत यांनी पुन्हा कर्नवडी, केळद, निगडे खुर्द भागातील ग्रामस्थांची भेट घेऊन संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. त्यानंतर ३७ कुटुंबांतील १५३ जणांचे स्थलांतर करण्यात आले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कर्णवडी ते रानवडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली.