शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

एमआयडीसी भूखंड दरात वाढ

By admin | Updated: March 22, 2016 01:27 IST

एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे.

भोसरी : एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे. मुदतीत अर्ज करूनही उद्योजकांना भूखंड दिले जात नाहीत. भूखंडाचे दर भरमसाट वाढविले आहेत. जमीन हस्तांतरण शुल्कात वाढ केली आहे. विजेचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे उद्योगांची कोंडी झाली आहे. एमआयडीसीने भूखंडाच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जानेवारीत घेतला आहे. मंदीच्या काळात या दरवाढीमुळे या किमती परवडत नसल्याने गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक लांबणीवर टाकत आहेत. जमीन हस्तांतरण शुल्कात वाढ केल्याने उद्योजकांची आर्थिक लूट केली जात आहे. एमआयडीसीच्या नियमानुसार परिसरातील लघुउद्योजकांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे उद्योगवाढीसाठी मर्यादा पडतात. उद्योगांना चालना देण्यासाठी ही तरतूद २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी प्रलंबित आहे. एमआयडीसी व महापालिकेतर्फे विविध सुविधा पुरविण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. परिसराचा औद्योगिक टाऊनशिप जाहीर करण्याची मागणी दुर्लक्षित आहे. एमआयडीसीने पाण्याचा दर प्रति हजार लिटरला २८.५० इतका अधिक आहे. हा दर अन्याय्य आहे. या भागातील जलवाहिन्या गंजल्या आहेत. भूमिगत गटार योजना करण्याबाबत एमआयडीसीकडून महापालिकेला सूचित केले जात नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हस्तांतरण झाल्याचे सांगत एमआयडीसी हात झटकून मोकळी होत आहे. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक परिसरात झोपडपट्ट्यांचा विळखा वाढतच आहे. त्यामुळे परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. भंगार दुकाने बोकाळली आहेत. याचा त्रास उद्योगांना होत आहे. परिसरातील विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर ४० वर्षांपेक्षा जुने आहे. त्यामुळे वारंवार फॉल्ट होऊन वीज खंडित होते. जुनी यंत्रणा असल्याने फॉल्ट शोधण्यात किमान ५ ते ६ तासांचा वेळ जातो. या काळात विजेअभावी उद्योग बंद ठेवावे लागतात. परिणामी, नुकसान होते. या प्रकारामुळे विशेषत: मध्यम व लघु उद्योजक वैतागले आहेत. (वार्ताहर)