शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

एमआयडीसी भूखंड दरात वाढ

By admin | Updated: March 22, 2016 01:27 IST

एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे.

भोसरी : एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे. मुदतीत अर्ज करूनही उद्योजकांना भूखंड दिले जात नाहीत. भूखंडाचे दर भरमसाट वाढविले आहेत. जमीन हस्तांतरण शुल्कात वाढ केली आहे. विजेचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे उद्योगांची कोंडी झाली आहे. एमआयडीसीने भूखंडाच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जानेवारीत घेतला आहे. मंदीच्या काळात या दरवाढीमुळे या किमती परवडत नसल्याने गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक लांबणीवर टाकत आहेत. जमीन हस्तांतरण शुल्कात वाढ केल्याने उद्योजकांची आर्थिक लूट केली जात आहे. एमआयडीसीच्या नियमानुसार परिसरातील लघुउद्योजकांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे उद्योगवाढीसाठी मर्यादा पडतात. उद्योगांना चालना देण्यासाठी ही तरतूद २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी प्रलंबित आहे. एमआयडीसी व महापालिकेतर्फे विविध सुविधा पुरविण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. परिसराचा औद्योगिक टाऊनशिप जाहीर करण्याची मागणी दुर्लक्षित आहे. एमआयडीसीने पाण्याचा दर प्रति हजार लिटरला २८.५० इतका अधिक आहे. हा दर अन्याय्य आहे. या भागातील जलवाहिन्या गंजल्या आहेत. भूमिगत गटार योजना करण्याबाबत एमआयडीसीकडून महापालिकेला सूचित केले जात नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हस्तांतरण झाल्याचे सांगत एमआयडीसी हात झटकून मोकळी होत आहे. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक परिसरात झोपडपट्ट्यांचा विळखा वाढतच आहे. त्यामुळे परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. भंगार दुकाने बोकाळली आहेत. याचा त्रास उद्योगांना होत आहे. परिसरातील विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर ४० वर्षांपेक्षा जुने आहे. त्यामुळे वारंवार फॉल्ट होऊन वीज खंडित होते. जुनी यंत्रणा असल्याने फॉल्ट शोधण्यात किमान ५ ते ६ तासांचा वेळ जातो. या काळात विजेअभावी उद्योग बंद ठेवावे लागतात. परिणामी, नुकसान होते. या प्रकारामुळे विशेषत: मध्यम व लघु उद्योजक वैतागले आहेत. (वार्ताहर)