शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मेट्रो स्थानकांचे कामही लवकरच सुरू

By admin | Updated: May 11, 2017 04:54 IST

बहुचर्चित पुणे मेट्रोच्या ‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स कॉर्नर’ या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या कामाच्या निविदेनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बहुचर्चित पुणे मेट्रोच्या ‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स कॉर्नर’ या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या कामाच्या निविदेनंतर आता लगेचच याच मार्गावरील ९ स्टेशनच्या कामाची निविदाही येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध होत आहे. मेट्रोच्या उन्नत (इलेव्हिटेड-रस्त्याच्या वरून जाणाऱ्या) मार्गावरील ही सर्व स्टेशनही मार्गाला जोडूनच म्हणजे उन्नतच असतील.या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गावर एकूण ९ स्टेशन असणार आहेत. प्रत्येक स्टेशनचा विस्तार १४० मीटर गुणिले ४० मीटर इतका असेल. हे स्टेशन मेट्रो मार्गाला जोडूनच असेल. सुरुवात जिथून होणार आहे ते पीसीएमसी स्टेशन व त्यानंतर तुकाराम नगर, भोसरी (नाशिक फाटा) कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी व रेंजहिल अशी ९ स्टेशन असणार आहेत. या १० स्टेशनच्या कामाची एकच निविदा असेल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली. येत्या दोनच दिवसांत निविदा प्रसिद्ध होईल. त्यानंतर मुदतीत आलेल्या कंपनीच्या निविदांपैकी पात्र निविदा मंजूर करून लवकरच याही कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.सर्व स्टेशन उन्नत असणार असून, जमिनीपासून ते साधारण २० ते २२ मीटर उंचीवर असतील. ती तीन स्तरांत विभागलेले असेल. पहिल्या स्तरावर मेट्रोमधून उतरता येईल. त्यानंतर लगेच त्याच्या खालील मजल्यावर प्रवेश होईल. तिथे कॅफेटेरिया असेल. या जागेतून थेट खाली म्हणजे रस्त्यावर येता येईल. ही सर्व स्टेशन अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येणार आहेत. एका स्टेशनचा बांधकामाचा खर्च साधारण ४० ते ४५ कोटी रुपयांपर्यंत असेल. त्यासाठीच्या जागापैकी बहुतेक जागा सरकारी मालकीच्या आहेत. त्या मिळण्यात काहीच अडचण नाही. जिथे अडचण आहे त्याठिकाणी संबधितांशी चर्चा करण्यासाठी महामेट्रोने एक समिती स्थापन केली असून, ही समिती त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढेल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.दीक्षित यांनी सांगितले की, स्टेशनवर चढण्या-उतरण्यासाठी सरकते जिने असतील. त्यामुळे कोणालाही उंचीचा त्रास होणार नाही. स्टेशनवरून उतरलेल्या प्रवाशांना लगेचच रिक्षा, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या बस यांची कनेक्टीव्हिटी मिळेल. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेशनच्या जवळ वाहनतळ असेल. महापालिकेबरोबर बोलून त्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोजवळ येताना किंवा मेट्रोपासून लांब जाताना प्रवाशांना काहीही त्रास होणार नाही. याशिवाय मेट्रो, बस यासाठी एकच कॉमन कार्ड चालेल. प्रवाशांना प्रत्येक वेळी तिकीट काढण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही. स्टेशनच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कंपनीला काम देईपर्यंत थोडा वेळ लागले. त्यानंतर मात्र तेही काम संबंधित ठेकेदार कंपनीला त्वरित सुरू करण्यास सांगण्यात येणार आहे. या कामाचा नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे; मात्र तो कमीतकमी होईल याची काळजी मेट्रो कंपनी घेणार आहे, असे दीक्षित यांनी सांगितले. नागरिकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.