शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

मीटरने पाणी योजना रखडली, केवळ नवीन जोडण्यांनाच मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:54 IST

चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे.

राजानंद मोरे बारामती : ‘चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे. सध्या केवळ नवीन नळजोडांनाच मीटरने पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या जोडांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मागील काही वर्षांत बारामती शहराचा विकास वेगाने झाला आहे. नागरीकरण वाढल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा देणेही आवश्यक आहे.त्यामध्ये सर्वांना समान पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पूर्वीच्या मातीच्या तलावाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. नवीन तलाव बांधण्यात आला. त्यामुळे आता बारामतीकरांना पाणीटंचाई भासत नाही. तसेच, २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे धोरण आहे.त्यानुसार दि. १ एप्रिल २०१५ पासून नवीन नळजोडाला मीटरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंतसुमारे २,२०० मीटर बसविण्यात आले आहेत. प्रत्येक नवीन जोडाला मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.जुन्या नळजोडांनाही मीटर बसविण्यात येणार आहेत. शहरात सुमारे ६ हजार ५०० जुने जोड आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा खूप जुनी आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी सर्व पाईपलाईनची यंत्रणा नव्याने उभारावी लागेल.याखेरीज, मीटर बसविणे शक्य होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना रखडली आहे.>काहींना बिलच नाहीबारामतीच्या वाढीव हद्दीतील बहुतेक नवीन नळजोडांना मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरचे बिल नगरपालिका प्रशासनाकडून संबंधितांना पाठविले जाते. पण, काहींना मागील वर्षभरात पाणीवापराचे बिलच मिळाले नसल्याचे समोर आले आहे.प्रशासनाकडून संबंधितांकडे कधी विचारणा केली नसल्याचे एका नागरिकाने सांगितले. त्यामुळे नगरपालिकेकडून राबविल्या जात असलेल्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, असे प्रकार होत नाहीत, याबाबतची तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती कळेल, असे सांगण्यात आले.>कितीही बिल भरायला तयारपाणीमीटर बसविल्यानंतर पाण्याचा वापर कमी होणे अपेक्षित आहे; पण काही नागरिकांकडून पाण्याचा बेसुमार वापर होतच आहे. पाणीवापराचे कितीही बिल आले, तरी हे नागरिक भरण्यास तयार आहेत. तर, काही नागरिकांनी पाण्याचा वापर कमी केल्याचे सकारात्मक चित्र आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.>सोसायट्यांमध्ये वादनवीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन जोडाबरोबरच मीटरही बसविण्यात आले आहेत. पण, हे मीटर मुख्य जोडणीला असल्याने प्रत्येक सदनिकाधारकाच्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे काही सोसायट्यांमधील सदस्यांमध्ये पाणीवापरावरून वाद होत आहेत. काही सदस्य जास्त वापर करीत असल्याने त्याचा भुर्दंड इतरांना सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.जुन्या नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन आहे. हे मीटर नागरिकांनाच बसवावे लागतील. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- योगेश कडूसकर, मुख्याधिकारी,बारामती नगरपालिका