शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मीटरने पाणी योजना रखडली, केवळ नवीन जोडण्यांनाच मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:54 IST

चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे.

राजानंद मोरे बारामती : ‘चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे. सध्या केवळ नवीन नळजोडांनाच मीटरने पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या जोडांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मागील काही वर्षांत बारामती शहराचा विकास वेगाने झाला आहे. नागरीकरण वाढल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा देणेही आवश्यक आहे.त्यामध्ये सर्वांना समान पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पूर्वीच्या मातीच्या तलावाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. नवीन तलाव बांधण्यात आला. त्यामुळे आता बारामतीकरांना पाणीटंचाई भासत नाही. तसेच, २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे धोरण आहे.त्यानुसार दि. १ एप्रिल २०१५ पासून नवीन नळजोडाला मीटरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंतसुमारे २,२०० मीटर बसविण्यात आले आहेत. प्रत्येक नवीन जोडाला मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.जुन्या नळजोडांनाही मीटर बसविण्यात येणार आहेत. शहरात सुमारे ६ हजार ५०० जुने जोड आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा खूप जुनी आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी सर्व पाईपलाईनची यंत्रणा नव्याने उभारावी लागेल.याखेरीज, मीटर बसविणे शक्य होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना रखडली आहे.>काहींना बिलच नाहीबारामतीच्या वाढीव हद्दीतील बहुतेक नवीन नळजोडांना मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरचे बिल नगरपालिका प्रशासनाकडून संबंधितांना पाठविले जाते. पण, काहींना मागील वर्षभरात पाणीवापराचे बिलच मिळाले नसल्याचे समोर आले आहे.प्रशासनाकडून संबंधितांकडे कधी विचारणा केली नसल्याचे एका नागरिकाने सांगितले. त्यामुळे नगरपालिकेकडून राबविल्या जात असलेल्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, असे प्रकार होत नाहीत, याबाबतची तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती कळेल, असे सांगण्यात आले.>कितीही बिल भरायला तयारपाणीमीटर बसविल्यानंतर पाण्याचा वापर कमी होणे अपेक्षित आहे; पण काही नागरिकांकडून पाण्याचा बेसुमार वापर होतच आहे. पाणीवापराचे कितीही बिल आले, तरी हे नागरिक भरण्यास तयार आहेत. तर, काही नागरिकांनी पाण्याचा वापर कमी केल्याचे सकारात्मक चित्र आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.>सोसायट्यांमध्ये वादनवीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन जोडाबरोबरच मीटरही बसविण्यात आले आहेत. पण, हे मीटर मुख्य जोडणीला असल्याने प्रत्येक सदनिकाधारकाच्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे काही सोसायट्यांमधील सदस्यांमध्ये पाणीवापरावरून वाद होत आहेत. काही सदस्य जास्त वापर करीत असल्याने त्याचा भुर्दंड इतरांना सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.जुन्या नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन आहे. हे मीटर नागरिकांनाच बसवावे लागतील. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- योगेश कडूसकर, मुख्याधिकारी,बारामती नगरपालिका