शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मीटरने पाणी योजना रखडली, केवळ नवीन जोडण्यांनाच मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:54 IST

चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे.

राजानंद मोरे बारामती : ‘चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे. सध्या केवळ नवीन नळजोडांनाच मीटरने पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या जोडांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मागील काही वर्षांत बारामती शहराचा विकास वेगाने झाला आहे. नागरीकरण वाढल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा देणेही आवश्यक आहे.त्यामध्ये सर्वांना समान पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पूर्वीच्या मातीच्या तलावाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. नवीन तलाव बांधण्यात आला. त्यामुळे आता बारामतीकरांना पाणीटंचाई भासत नाही. तसेच, २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे धोरण आहे.त्यानुसार दि. १ एप्रिल २०१५ पासून नवीन नळजोडाला मीटरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंतसुमारे २,२०० मीटर बसविण्यात आले आहेत. प्रत्येक नवीन जोडाला मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.जुन्या नळजोडांनाही मीटर बसविण्यात येणार आहेत. शहरात सुमारे ६ हजार ५०० जुने जोड आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा खूप जुनी आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी सर्व पाईपलाईनची यंत्रणा नव्याने उभारावी लागेल.याखेरीज, मीटर बसविणे शक्य होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना रखडली आहे.>काहींना बिलच नाहीबारामतीच्या वाढीव हद्दीतील बहुतेक नवीन नळजोडांना मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरचे बिल नगरपालिका प्रशासनाकडून संबंधितांना पाठविले जाते. पण, काहींना मागील वर्षभरात पाणीवापराचे बिलच मिळाले नसल्याचे समोर आले आहे.प्रशासनाकडून संबंधितांकडे कधी विचारणा केली नसल्याचे एका नागरिकाने सांगितले. त्यामुळे नगरपालिकेकडून राबविल्या जात असलेल्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, असे प्रकार होत नाहीत, याबाबतची तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती कळेल, असे सांगण्यात आले.>कितीही बिल भरायला तयारपाणीमीटर बसविल्यानंतर पाण्याचा वापर कमी होणे अपेक्षित आहे; पण काही नागरिकांकडून पाण्याचा बेसुमार वापर होतच आहे. पाणीवापराचे कितीही बिल आले, तरी हे नागरिक भरण्यास तयार आहेत. तर, काही नागरिकांनी पाण्याचा वापर कमी केल्याचे सकारात्मक चित्र आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.>सोसायट्यांमध्ये वादनवीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन जोडाबरोबरच मीटरही बसविण्यात आले आहेत. पण, हे मीटर मुख्य जोडणीला असल्याने प्रत्येक सदनिकाधारकाच्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे काही सोसायट्यांमधील सदस्यांमध्ये पाणीवापरावरून वाद होत आहेत. काही सदस्य जास्त वापर करीत असल्याने त्याचा भुर्दंड इतरांना सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.जुन्या नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन आहे. हे मीटर नागरिकांनाच बसवावे लागतील. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- योगेश कडूसकर, मुख्याधिकारी,बारामती नगरपालिका