शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

मेस बांबूच्या लागवडीने शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

पुणे : सह्याद्रीमधील जंगलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मेस हा बांबू पाहायला मिळतो. परंतु, माणगा आणि मेस अशी वेगळी ओळख ...

पुणे : सह्याद्रीमधील जंगलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मेस हा बांबू पाहायला मिळतो. परंतु, माणगा आणि मेस अशी वेगळी ओळख बांबूला नव्हती. त्यामुळे दोन्ही वेगळे असल्याचे मला निदर्शनास आले. त्यानुसार मी गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे निरीक्षण करत आहे. खरंतर यात माझे काहीच नाही. भोर, वेल्हा, मुळशी परिसरातील शेतकऱ्यांना हा बांबू चांगला माहिती आहे आणि ते त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे मी फक्त संशोधन केले आहे. सर्व श्रेय तर शेतकऱ्यांना आहे, अशा भावना वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. पी. तेतली यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे एक चांगले साधन म्हणून मेस बांबूची लागवड योग्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी परिसरात मोठ्या प्रमाणावर सापडणाऱ्या मेस या नव्या बांबूच्या प्रजातीचा शोध डॉ. तेतली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच लावला आहे. परंतु, बांबूकडे अजूनही शेतकरी उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून पाहत नाहीत. त्यामुळे याविषयी डॉ. तेतली यांच्याशी संवाद साधला.

डॉ. तेतली म्हणाले,‘‘मेस हा बांबू अतिशय टिकाऊ असतो. ही ओळख प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना झाली. बांबूची शेती अतिशय चांगली असून, त्यापासून उत्पन्न मिळत आहे. आज शेकडो शेतकरी बांबूची लागवड करून पैसे मिळवत आहेत. मी भोर, वेल्हा, मुळशीत गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला. गटागटाने शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व सांगितले. अगोदर पासून त्या परिसरात बांबूचे उत्पादन आहेच. पण अजून करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.’’

———————————

मेस बांबूपासून चांगले उत्पन्न

शेतकऱ्यांनी मेस बांबूची लागवड केल्यास त्याला चांगला भाव येतो. सध्या ६० ते १२० रुपयाला एक बांबू विकला जातो. हा दर शेतातही मिळतो. शेतकऱ्यांनी फक्त बांबूची लागवड करून वाढवायचा. तो कापणे आणि ट्रकमध्ये घेऊन जाण्याचे काम व्यापारी करतात. अशा प्रकारचे अनेक शेतकरी काम करत आहेत, असे डॉ. तेतली म्हणाले.

———————————-

सरकारकडून पानशेत आणि वेल्हा या ठिकाणी बांबूचे प्लांट उभे करण्यासाठी निधी दिला आहे. त्यातून येथे बांबूवर प्रक्रिया करून ते अधिक मजबूत करण्यात येतील. बांबूवर प्रक्रिया केल्यावर ते ३० ते ४० वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात.

- डॉ. पी. तेतली, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ

————————————-