शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST

पुणे : एसटीची आर्थिक स्थिती बिकट आहे. कोरोनामुळे तर आणखीच वाईट झाली आहे. एसटीचा रोजचा प्रवास हा अधिक ...

पुणे : एसटीची आर्थिक स्थिती बिकट आहे. कोरोनामुळे तर आणखीच वाईट झाली आहे. एसटीचा रोजचा प्रवास हा अधिक तोटा देणारा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे किंवा एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

राज्य परिवहन महामंडळ शासनाच्या निर्देशानुसार विविध घटकांना प्रवासी तिकीट दरात सवलत देते. त्या बदल्यात राज्य सरकार महामंडळाला दरवर्षी सुमारे ३ हजार कोटी रुपये देते. जर महामंडळ शासनात विलीन झाले, तर त्या ३ हजार कोटी रुपयांची बचत होईल. तसेच राज्य सरकारने बस खरेदी करणे, बसस्थानकांचे नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि नवीन बांधणीसाठी तातडीने आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी बरगे यांनी केली.

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते जाहीर करून कोरोना प्रादुर्भावामुळे एसटी वाहतूक अजून सुरळीत झालेली नाही. या पुढेही अजून काही महिने ती सुरळीत होण्याची शक्यता दिसत नाही. ती होईपर्यंत दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रुपये २८० कोटी इतकी आर्थिक मदत करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ृृृृृृ--------------------------------

१८ महिन्यांत ९ हजार कोटींचा संचित तोटा :

मागील १८ महिन्यांत एसटीचे साडेचार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच ९ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. एवढा तोटा असताना एसटी नफ्यात लवकर येण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला तत्काळ मदत करण्याची गरज आहे, असेही बरगे यांनी सांगितले.