शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

व्यापाऱ्याने घातला शेतकऱ्यांना गंडा

By admin | Updated: April 22, 2017 03:36 IST

निमगाव केतकी (ता. इंदापूर) गावामध्ये परराज्यातील बहुसंख्य व्यापारी येऊन परिसरातील गावातील तालुक्यातील शेतमाल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सौदा करून

निमगाव केतकी : निमगाव केतकी (ता. इंदापूर) गावामध्ये परराज्यातील बहुसंख्य व्यापारी येऊन परिसरातील गावातील तालुक्यातील शेतमाल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सौदा करून विकत घेतात. या व्यापाऱ्यांकडून हा सर्व माल चढ्या भावाने विकत घेणारा मोठा व्यापारीच त्याचे पैसे घेऊन मागील आठवड्यात फरार झाला आहे़झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील फुलवडिया (तालुका राजमहल) गावातील समसुलभाई शेख (वय ५५) व्यापारी त्यांच्या राज्यासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातील ४२ व्यापाऱ्यांचे तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम घेऊन गायब झाला. इंदापूर तालुक्यातील बहुतांशी गावात डाळिंबाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. या शेतकऱ्यांचा माल थेट बांधावर जाऊन बरेच लहानसहान व्यापारी दलाल मालाचा दर्जा बघून सौदा करून विकत घेतात. हा विकत घेतलेला माल हा समसुलनामक व्यापारी विकत घेत होता. या व्यापाऱ्याने मागील दोन वर्षांत बाजारामध्ये जम बसविला होता. त्यामुळे त्याच्यावर व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनीही विश्वास ठेवून व्यवहार केले होते़ मात्र, याचा फायदा घेत व्यापाऱ्याने सुमारे एक कोटी रुपयाला फसवून रातोरात मोबाईल बंद करून पोबारा केला़ याच व्यापाऱ्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील व्यापाऱ्यांचा व शेतकऱ्यांची अशीच किमान साठ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. सांगोल्यातील बरेच व्यापारी निमगावात येरझाऱ्या मारत आहेत. गावातील एका शेतकऱ्याला मालाचे दोन लाख रुपये दुपारी देतो, म्हणून गेला आहे तो अद्याप आलाच नाही, असे त्याने सांगितले. गावातील दुकानदार, मोठे कंपनीमालक तसेच डाळिंब पॅकिंगचे बॉक्स आदी साहित्य यांचेही काही लाखांत उधारी करून या व्यापाऱ्याने पळ काढला़ त्यामुळे मुक्तार मुलाणी यांनीही इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून तशा आशयाच्या तक्रारी अनेकांनी देण्यास सुरुवात केल्या आहेत. - आर्थिक फसवणुकीमुळे एरवी गजबजलेली डाळिंब व्यापारपेठ थंडावली आहे. काही शेतकऱ्यांनी मधले दलालांशिवाय डाळिंब विक्री केली़ असे शेतकरी तर कपाळाला हात लावून बसले आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्याही जास्त असण्याची शक्यता आहे.याबाबत फसवणूक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी आम्ही कायदेशीर लढा उभारणार असल्याचे शेतकरी चळवळीचे अ‍ॅड. सचिन राऊत व अ‍ॅड. श्रीकांत करे यांनी सांगितले.