शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पस्तिशीच्या उंबरठ्यावरच स्त्रियांची रजोनिवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. आजकाल रजोनिवृत्तीचे अर्थात मासिक पाळी कायमची बंद होण्याचे वय पस्तिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अनुवंशिकता, केमोथेरपीसारखे उपचार यामुळे महिलांना कमी वयातल्या रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागत आहे.

पाळीचे दिवस बदलणे, रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे, ओटीपोटात तीव्र वेदना होणे अशी लक्षणे रजोनिवृत्ती जवळ आल्यास दिसायला लागतात. साधारणपणे वयाच्या ४५ व्या वर्षांनंतर रजोनिवृत्ती जवळ येऊ लागते. आजकाल अनेक स्त्रियांमध्ये हे वय ३५-४० वयोगटापर्यंत खाली आले आहे. रजोनिवृत्ती लवकर आल्यास पुढील १०-१२ वर्षे हार्मोनल थेरपी घेण्याची गरज भासू शकते. कोणतेही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना देशकर म्हणाल्या, ‘रजोनिवृत्ती येण्याचे वय साधारणपणे ४५-५२ वयोगट एवढे असते. काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येते. यामध्ये अनुवंशिकता हे प्रमुख कारण असते. याशिवाय, गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यास अर्थातच मासिक पाळी जाते. कर्करोगासाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी असे उपचार सुरू असल्यासही मासिक पाळी लवकर जाते.’

--------------

“आपल्या शरीरासाठी इस्ट्रोजेन हे संप्रेरक महत्त्वाचे असते. रजोनिवृत्ती लवकर आल्यास या हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित होते. घाम येणे, लवकर थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे, वारंवार मूड बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात. बरेचदा तरुणी उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेतात. काही कारणाने त्यांच्यात लवकर रजोनिवृत्ती आल्यास गर्भधारणेत अडचणी येतात. योनीमार्ग कोरडा पडल्यास लैंगिक संबंधांत समस्या येऊ शकतात. ही सर्व गुंतागुंत टाळण्यासाठी तिशीनंतर रक्ततपासणी, सोनोग्राफी तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या वेळेत करून घेणे हिताचे ठरते. समस्येचे वेळीच निदान झाल्यास उपचारही सुरू करता येतात.

- डॉ. मंगला वाणी, स्त्रीरोगतज्ज्ञ

----------------

काय काळजी घ्यावी?

“रजोनिवृत्तीच्या काळात आहार, व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे. रजोनिवृत्ती कधीही आली तरी स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. अंगदुखी, डोकेदुखी, अकारण चिडचिड होणे, एकटेपणा वाटणे असा त्रास होतो. या नाजूक टप्प्यावर स्त्रीला कुटुंबाने आधार देणे, तिचा त्रास समजून घेणे आवश्यक असते. स्त्रियांनीही स्वत:ला आवडीच्या कामात, छंदात गुंतवून ठेवावे.”

-