शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पस्तिशीच्या उंबरठ्यावरच स्त्रियांची रजोनिवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. आजकाल रजोनिवृत्तीचे अर्थात मासिक पाळी कायमची बंद होण्याचे वय पस्तिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अनुवंशिकता, केमोथेरपीसारखे उपचार यामुळे महिलांना कमी वयातल्या रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागत आहे.

पाळीचे दिवस बदलणे, रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे, ओटीपोटात तीव्र वेदना होणे अशी लक्षणे रजोनिवृत्ती जवळ आल्यास दिसायला लागतात. साधारणपणे वयाच्या ४५ व्या वर्षांनंतर रजोनिवृत्ती जवळ येऊ लागते. आजकाल अनेक स्त्रियांमध्ये हे वय ३५-४० वयोगटापर्यंत खाली आले आहे. रजोनिवृत्ती लवकर आल्यास पुढील १०-१२ वर्षे हार्मोनल थेरपी घेण्याची गरज भासू शकते. कोणतेही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना देशकर म्हणाल्या, ‘रजोनिवृत्ती येण्याचे वय साधारणपणे ४५-५२ वयोगट एवढे असते. काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येते. यामध्ये अनुवंशिकता हे प्रमुख कारण असते. याशिवाय, गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यास अर्थातच मासिक पाळी जाते. कर्करोगासाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी असे उपचार सुरू असल्यासही मासिक पाळी लवकर जाते.’

--------------

“आपल्या शरीरासाठी इस्ट्रोजेन हे संप्रेरक महत्त्वाचे असते. रजोनिवृत्ती लवकर आल्यास या हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित होते. घाम येणे, लवकर थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे, वारंवार मूड बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात. बरेचदा तरुणी उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेतात. काही कारणाने त्यांच्यात लवकर रजोनिवृत्ती आल्यास गर्भधारणेत अडचणी येतात. योनीमार्ग कोरडा पडल्यास लैंगिक संबंधांत समस्या येऊ शकतात. ही सर्व गुंतागुंत टाळण्यासाठी तिशीनंतर रक्ततपासणी, सोनोग्राफी तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या वेळेत करून घेणे हिताचे ठरते. समस्येचे वेळीच निदान झाल्यास उपचारही सुरू करता येतात.

- डॉ. मंगला वाणी, स्त्रीरोगतज्ज्ञ

----------------

काय काळजी घ्यावी?

“रजोनिवृत्तीच्या काळात आहार, व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे. रजोनिवृत्ती कधीही आली तरी स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. अंगदुखी, डोकेदुखी, अकारण चिडचिड होणे, एकटेपणा वाटणे असा त्रास होतो. या नाजूक टप्प्यावर स्त्रीला कुटुंबाने आधार देणे, तिचा त्रास समजून घेणे आवश्यक असते. स्त्रियांनीही स्वत:ला आवडीच्या कामात, छंदात गुंतवून ठेवावे.”

-