शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

पस्तिशीच्या उंबरठ्यावरच स्त्रियांची रजोनिवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. आजकाल रजोनिवृत्तीचे अर्थात मासिक पाळी कायमची बंद होण्याचे वय पस्तिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अनुवंशिकता, केमोथेरपीसारखे उपचार यामुळे महिलांना कमी वयातल्या रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागत आहे.

पाळीचे दिवस बदलणे, रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे, ओटीपोटात तीव्र वेदना होणे अशी लक्षणे रजोनिवृत्ती जवळ आल्यास दिसायला लागतात. साधारणपणे वयाच्या ४५ व्या वर्षांनंतर रजोनिवृत्ती जवळ येऊ लागते. आजकाल अनेक स्त्रियांमध्ये हे वय ३५-४० वयोगटापर्यंत खाली आले आहे. रजोनिवृत्ती लवकर आल्यास पुढील १०-१२ वर्षे हार्मोनल थेरपी घेण्याची गरज भासू शकते. कोणतेही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना देशकर म्हणाल्या, ‘रजोनिवृत्ती येण्याचे वय साधारणपणे ४५-५२ वयोगट एवढे असते. काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येते. यामध्ये अनुवंशिकता हे प्रमुख कारण असते. याशिवाय, गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यास अर्थातच मासिक पाळी जाते. कर्करोगासाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी असे उपचार सुरू असल्यासही मासिक पाळी लवकर जाते.’

--------------

“आपल्या शरीरासाठी इस्ट्रोजेन हे संप्रेरक महत्त्वाचे असते. रजोनिवृत्ती लवकर आल्यास या हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित होते. घाम येणे, लवकर थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे, वारंवार मूड बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात. बरेचदा तरुणी उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेतात. काही कारणाने त्यांच्यात लवकर रजोनिवृत्ती आल्यास गर्भधारणेत अडचणी येतात. योनीमार्ग कोरडा पडल्यास लैंगिक संबंधांत समस्या येऊ शकतात. ही सर्व गुंतागुंत टाळण्यासाठी तिशीनंतर रक्ततपासणी, सोनोग्राफी तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या वेळेत करून घेणे हिताचे ठरते. समस्येचे वेळीच निदान झाल्यास उपचारही सुरू करता येतात.

- डॉ. मंगला वाणी, स्त्रीरोगतज्ज्ञ

----------------

काय काळजी घ्यावी?

“रजोनिवृत्तीच्या काळात आहार, व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे. रजोनिवृत्ती कधीही आली तरी स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. अंगदुखी, डोकेदुखी, अकारण चिडचिड होणे, एकटेपणा वाटणे असा त्रास होतो. या नाजूक टप्प्यावर स्त्रीला कुटुंबाने आधार देणे, तिचा त्रास समजून घेणे आवश्यक असते. स्त्रियांनीही स्वत:ला आवडीच्या कामात, छंदात गुंतवून ठेवावे.”

-