शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मेट्रोसाठी दिल्लीत बैठक

By admin | Updated: March 4, 2015 00:34 IST

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मेट्रोसाठी १२६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्यानंतर आता या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी केंद्र शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मेट्रोसाठी १२६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्यानंतर आता या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी केंद्र शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (बुधवारी) केंद्रीय नगरसचिव विभागाने बैठक बोलविली असून, या बैठकीला महापालिका आयुक्त कुमार यांच्यासह वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचा नारळ फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून केवळ चर्चेच्या मार्गावर धावत असलेली पुणे मेट्रो सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) च्या मान्यतेच्या स्टेशनवर आहे. पीआयबीच्या मान्यतेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ही मान्यता देण्याआधी या प्रकल्पाची गरज लक्षात मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतेच अर्थसंकल्पामध्ये १२६ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर, पालिकेच्या अंदाजपत्रकातही २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे निधीचा मार्ग सुकर झाला असून, अंतिम मान्यतेसाठी केंद्रातील हालचालींना वेग आला आहे. बैठकीत शहरातील काही तज्ज्ञांनी भुयारी मार्गाबाबत केलेल्या सूचनांनुसार तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी व अधिकारी पातळीवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी मागील चार महिन्यांपासून पीआयबीसमोर मेट्रो प्रकल्पाबाबत निर्णय होऊ शकलेला नव्हता. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेऊन तो केंद्राला कळविला जाणार आहे. केंद्राची बैठक होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येत्या शनिवारी ( दि.७) केवळ मेट्रो प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये मेट्रो प्रकल्पाशिवाय अन्य प्रश्नांवर चर्चा होणार नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत कळविण्यात आल्याचे भाजपाचे शहर अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी कळविले आहे.