शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वैद्यकीय सज्जता काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST

कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला भविष्यात वैद्यकीयदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज आहे. तसेच, रुग्णांमागे डाॅक्टरांचे ...

कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला भविष्यात वैद्यकीयदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज आहे. तसेच, रुग्णांमागे डाॅक्टरांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा सामना करणे शक्य आहे.

एमबीबीएस, एमडी शिक्षण घेतल्यानंतर कार्डिओमेट क्लिनिकच्या माध्यमातून मी १८ वर्षांपासून मधुमेहींवर उपचार करत आहेत. माझे आजोबा सांगलीत डाॅक्टर होते. अतिशय सेवाभावी वृत्तीने ते काम करायचे. रुग्णांकडून ते अनेकदा शुल्कही घेत नसत. त्यांची रुग्णसेवा जवळून अनुभवल्याने मी बालपणीच डाॅक्टर होण्याचा निश्चय केला होता. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडे मी आकर्षित झाले. कोरोनाच्या काळात काम थांबवले नाही. मधुमेह असो की नसो कोणालाही कोरोनाचा संसर्ग होत होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर मधुमेह होणं आणि कोरोना झाल्यावर मधुमेह होण्याचे प्रमाण या काळात वाढले. माझे मधुमेहाचे रुग्ण कोरोनाचा संसर्ग झाल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे कोरोनाकाळात सातत्याने रुग्णालयात थांबावे लागत होते. एकावेळी माझ्याकडे १०० रुग्ण दाखल असायचे. त्यामुळे कोरोना, मधुमेह आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत मी अगदी जवळून अनुभवली. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये लाॅकडाऊन असतानाही आम्ही काम थांबवले नाही. उलट जास्त कामाचा ताण असतानाही आम्ही कार्डिओमेट क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी दिवसरात्र झटत होतो. रुग्ण बरे होऊन घरी जावेत आणि कोरोनाची लाट नियंत्रणात यावी एवढाच यामागे उद्देश होता.

कोरोनाकाळात सतत बेडसाठी फोन येत होते. मात्र, अनेक रुग्णालयांमध्ये, माझ्या क्लिनिकमध्येही बेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांना नाही म्हणणे अतिशय क्लेशदायक होते. माझ्या वैद्यकीय कारकिर्दीतील हा सर्वात वाईट कालावधी होता. एका डाॅक्टरमागे किती रुग्ण असावेत याचे प्रमाण आपल्या देशात व्यस्त आहे. त्यामुळे एका डाॅक्टरवर प्रचंड कामाचा ताण आहे, त्यामुळे भविष्यात त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. कोरोनाकाळात डाॅक्टरांबद्दलच्या कृतज्ञतेत वाढ झाली आहे. अनेक रुग्ण येऊन धन्यवाद देतात. रडणारे रुग्ण पाहून आम्हालाही गहिवरून येते.

डाॅक्टर वाढावेत, रुग्णालये वाढावीत, लहान-लहान क्लिनिक वाढावेत, सरकारने त्यासाठी मदत करावी ही आजची सामाजिक गरज आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज नव्हतो, हे कोरोनाच्या दोन्ही लाटांवरून दिसून आले. अनेक रुग्णांना अतिदक्षता विभागात बेड हवा होता. मात्र, आयसीयू बेड उपलब्ध झाले नाहीत. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले. त्यामुळे नवे डाॅक्टर तयार होणे गरजेचे आहे. तसेच, त्यांना योग्य प्रशिक्षणही मिळायला हवे. आपली लोकसंख्या खूप असल्यामुळे आपल्याला वैद्यकीयदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न पाहता आवड म्हणून पाहण्याची गरज आहे. केवळ पैसा मिळेल म्हणून या क्षेत्रात येऊ नये. सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यासाठीच वैद्यकीय क्षेत्र निवडावे.

(विशेष मुलाखत)