शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वैद्यकीय प्रवेशात परप्रांतीयांची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:43 IST

वैद्यकीय प्रवेशामध्ये परप्रांतीयांनी अवैधरीत्या घुसखोरी सुरू केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करावी.

बारामती : वैद्यकीय प्रवेशामध्ये परप्रांतीयांनी अवैधरीत्या घुसखोरी सुरू केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करावी. याबाबत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. २०१७ मध्ये राज्याबाहेरून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोमिसाईल-अधिवास प्रमाणपत्रांची तपासणी करावी. या तपासणीद्वारे वैद्यकीय प्रवेशामध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांची झालेली घुसखोरी रोखावी, अशी मागणी प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक अभियंता हेमचंद्र शिंदे यांनी केली आहे.आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे शिंदे यांनी मागणी केली आहे. राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील ८५ टक्क्यांमधून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे इच्छुक विद्यार्थ्यांकडून नावनोंदणी करून १२ जुलै रोजी नीट २०१७ च्या गुणवत्तेनुसार राज्याची गुणवत्ता यादी जाहीर केली. आॅनलाइन पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया २२ जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केली आहे.प्रवेश पात्रता निकषामध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग माहितीपत्रक पान क्रमांक ५ नियत ४.५ नुसार विद्यार्थ्याची १० वी व १२ वी परीक्षा राज्यातून उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. यामध्ये काही अपवादात्मक व्यक्तींना सूट आहे. काही परप्रांतीय विद्यार्थ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात इतर राज्यांतून १० वी असेल, तसेच महाराष्ट्रात १२ वी असेल तरी प्रवेश मिळावा, अशी याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने १२ वी राज्यातून देणे व अवैध पद्धतीने अधिवास प्रमाणपत्र प्राप्त करून गुणवत्ता शिरकाव करण्याचे परप्रांतीयांनी ठरवूनच यादीमध्ये स्थान मिळविले आहे. एमबीबीएस प्रवेश एका, एका मेरिट क्रमांकावर अवलंबून असतो. या अवैध घुसखोरीमुळे राज्यातील मूळ भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याने अधिवास प्रमाणपत्र तपासणी होणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनस्तरावर त्वरित कमीत कमी त्रिसदस्यीय समिती स्थापन करावी. त्यामार्फत राज्याबाहेरील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्रपणे तयार करावी.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे कागदपत्रांची तपासणी झाली असून त्यांच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याची छायांकित प्रत उपलब्ध आहे. या सर्वांची अधिवासपत्र कमिटीने ताब्यात घ्यावीत. ज्या जिल्ह्यातून अधिवास प्रमाणपत्र काढले आहे, त्या जिल्हाधिकाºयांकडे संबंधित प्रमाणपत्राची प्रत तपासणीसाठी पाठवावी. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या स्तरावर संबंधितांचे १५ वर्षांचे वास्तव्य आहे का, याबाबत सत्यता पडताळून पाहावी. तपासणीनंतर स्वत: जिल्हाधिकाºयांनी योग्य किंवा अयोग्य असा शेरा मारून कमिटीकडे पाठवावे. या पद्धतीने नियोजन करावे.