शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिक पद्धतीने पाणीचोरी

By admin | Updated: May 15, 2016 00:42 IST

येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे

दौंड : येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे. पाणी दौंड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेले खानवटेपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे पाणी वडगाव दरेकर या गावापर्यंतच पोहोचू शकले नाही, ते केवळ नदीपात्रातील पाणीचोरी आणि बेसुमार वाळू उपशामुळे झालेले खड्डे. तसेच ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे वडगाव दरेकरच्या पुढील गावातील शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिलेले आहेत. जिथपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचले, त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना झाला. नदी आटत चालली असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून हे पाणी काही ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या पद्धतीने सर्रासपणे चोरून ते टॅँकरमध्ये भरून इतरत्र वापरले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साधारणत: एका वाळूच्या ट्रकमधील वाळू धुण्यासाठी किमान ५०० लिटरच्या जवळपास पाणी लागते. परिणामी, तालुक्यात ठिकठिकाणी दररोज १०० च्या वर बेकायदेशीर ट्रकमधील वाळू धुतली जाते. >निरगुडेतील बंधाऱ्यातून खासगी वापरासाठी उपसाशेटफळगढे : निरगुडे (ता. इंदापूर) येथील खडकवासला कालव्यातून भरलेल्या बंधारा आणि लगतच्या खासगी विहिरीचा उपसा बंद करावा, अशी मागणी गावचे उपसरपंच ब्रह्मदेव केकाण यांनी केली आहे. नुकतेच खडकवासला कालव्यातून पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यामधून सार्वजनिक विहिरीलगतचे बंधारे भरलेले आहेत. मात्र, बंधाऱ्यालगत अन्य खासगी विहिरी आणि विद्युतपंपाच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू झाला आहे. या पाणीउपशामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे बंधारे आणि सार्वजनिक विहिरीलगतचा खासगी पाणीउपसा बंद करावा, अशी मागणी उपसरपंच केकाण यांनी केली आहे. उपसा करणारे शेतकरी यांना उपसा बंदच्या सूचना तालुका प्रशासनने कराव्यात, सूचना करूनही जे उपसा करतील, त्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केकाण यांनी केली.