शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रिकाम्या स्टेडियममुळे ‘एमसीए’चे बुडाले ९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे (जि. पुणे) येथील क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे (जि. पुणे) येथील क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका बुधवारपासून (दि. २३) सुरू होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार असल्याने ‘एमसीए’ला सुमारे नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

एमसीए मैदानाची प्रेक्षकक्षमता २८ हजार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकीट विक्रीतून एका सामन्याला तीन-साडेतीन कोटी रुपये एमसीएला मिळतात. मात्र यंदा कोरोना साथीमुळे प्रेक्षकांशिवाय सामने आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने ‘एमसीए’ला दिली आहे.

‘एमसीए’चे अध्यक्ष विकास काकतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “क्रिकेट सामन्यांच्या आयोजनातून प्रामुख्याने तीन प्रकारे आयोजकांना उत्पन्न मिळते. एक असते तिकीटविक्री. मात्र यंदा तो पर्याय बाद झाला आहे. ‘इन स्टेडिया राईट्स’ हा दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे. मैदानातील जाहिरातींद्वारे हे उत्पन्न मिळते. या वेळी एका सामन्यासाठी या माध्यमातून तीन कोटी रुपये याप्रमाणे तीन सामन्यांचे नऊ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. सामन्याच्या आयोजनासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) स्थानिक संघटनेला ठराविक रक्कम देते. या माध्यमातून एमसीएला साडेचार कोटी रुपये मिळतील.”

शून्य प्रेक्षकसंख्येमुळे थेट नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानापेक्षाही पुण्यातील क्रिकेटरसिक सामन्याच्या आनंदाला मुकणार हे नुकसान मोठे आहे. यापूर्वी ‘एमसीए’ने अगदी तीनशे रुपयांपासून सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना तिकिटे उपलब्ध करुन दिली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना अत्यल्प काही वेळा विनामूल्य सामन्यांचा आनंद लुटू दिला आहे. कोरोनामुळे ही संधी या वेळी पुणेकर क्रिकेटरसिकांना मिळणार नाही.

चौकट

एवढा येतो खर्च

“प्रेक्षकांविना खेळल्या जाणाऱ्या एका एकदिवसीय सामन्याच्या आयोजनासाठी ७० ते ८० लाख रुपये खर्च येतो. एरवी स्टेडियम प्रेक्षकांनी भरलेले असेल तर हाच खर्च दोन कोटी रुपयांच्या घरात जातो. यात मोठा खर्च सुरक्षा व्यवस्थेचा असतो. मात्र एका सामन्यामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो. ‘एमसीए’ला तिकीटविक्रीतून काहीच उत्पन्न मिळणार नसले तरी अन्य उत्पन्न सुमारे बारा-तेरा कोटींपर्यंत जाईल.” -विकास काकतकर, अध्यक्ष, एमसीए

चौकट

‘एमसीए’चा इतिहास

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १३ ऑक्टोबर २०१३ रोजी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताचा ७२ धावांनी पराभव झाला. या मैदानावरील शेवटचा एकदिवसीय सामना २७ ऑक्टोबर २०१८ या दिवशी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. याही सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून ४३ धावांनी पराभूत झाला. या व्यतिरिक्त इंग्लंड (१५ जानेवारी २०१७) आणि न्यूझीलंड (२५ ऑक्टोबर २०१७) यांच्याविरुद्ध भारताने दोन सामने येथे खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांत मात्र भारत विजयी झालाय. आजवर येथे खेळल्या गेलेल्या चारपैकी दोन सामन्यांत विजय, दोनमध्ये पराभव ही भारताची कामगिरी आहे.