शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच ठरविणार महापौर : अशोक चव्हाण

By admin | Updated: February 18, 2017 03:08 IST

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेकडे स्वाभिमान शिल्लक असेल, तर राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडावे

पिंपरी : मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेकडे स्वाभिमान शिल्लक असेल, तर राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडावे. भाजपाने अच्छे दिनाचे गाजर दाखवून नोटाबंदी केली. त्याचा परिणामामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. आरबीआय ही भाजपा आणि आरएसएसची शाखा असल्याचे वाटते, अशी टीका प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाकड येथे केली.प्रभाग क्र. २६ मधील कॉंग्रेसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे, संजीवनी जगताप यांच्या प्रचारासाठी पिंपळे निलख, विशालनगर येथे जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी खासदार हुसेन दलवाई, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, प्रचारप्रमुख व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी महापौर कवीचंद भाट, सेवादल शहराध्यक्ष संग्राम तावडे, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, राजेंद्रसिंग वालिया, शहाबुद्दीन शेख, विष्णू नेवाळे, श्याम अगरवाल, नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, लक्ष्मण रुपनर, अनंत कुंभार, संकेत जगताप, सुनील साठे, काळुशेठ नांदगुडे, कुमार नांदगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, विजय जगताप, नंदकिशोर रणदिवे, नागेश जाधव, योगेश पासलकर, नीलेश जगताप, सुरेश गायकवाड, बाळासाहेब जगताप, सुधीर वसंत साठे, शैलेश कर्नावट, सनी शिंदे, विशाल जगताप, अरुण नांदगुडे, बाळासाहेब कस्पटे, संदेश जयसिंग भोसले, अशोक मेंगळे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘‘परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख भरण्याचे आश्वासन दिले. काय झाले? मोदींनी वैयक्तिक हट्टापायी नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांवर लादला. काळा पैसा आला तर नाहीच, मात्र दोनशे नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही आर्थिक मंदी आहे.नैतिकतेचा टेंभा मिरवणारे गुंडांना पक्ष प्रवेश देऊन त्यांना सुधारण्याची संधी दिली अशी भाषा केली जाते. स्वर्गीय अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या विचाराने शहराचा विकास झाला. विकासाची फळे चाखून, काहीजण दुसऱ्या पक्षात गेले. पिंपरीचा महापौर कॉँग्रेसच ठरवेल. (प्रतिनिधी)