शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मास्कचा काळाबाजार

By admin | Updated: March 13, 2015 06:28 IST

स्वाइन फ्लूची तीव्रता दिवसेन््दिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे

पिंपरी : स्वाइन फ्लूची तीव्रता दिवसेन््दिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात पुन्हा २००९प्रमाणे मास्क दिसू लागले आहेत. त्याचा काळाबाजार पुन्हा सुरू झाला आहे. मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. शाळेतील मुलांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. नागरिकही जिवाच्या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात मास्क वापरताना दिसून येत आहेत. शासन स्तरावरून किंवा महापालिका प्रशासनाकडून स्वाइन फ्लूबाबत लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. २००९मध्ये स्वाइन फ्लूने घातलेल्या थैमानाचा अनुभव पाठीशी असतानाही त्याबाबत शासन गाफील राहिले व त्यामुळे गोळ्यांचा तुटवडा जाणवला. त्यासाठी आधीच उपाययोजना करण्याची गरज होती. ती केली नाही. त्यामध्ये अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. प्रशासन सांगते, की तो विषाणू असल्याने त्याला रोखणे अवघड आहे. मात्र, प्रभावी उपाययोजनांमुळे आपण त्यावर मात तरी करू शकतो, हे प्रशासन विसरले व हवामानाला आणि विषाणूला दोष देण्यातच त्यांनी धन्यता मानली. स्वाइन फ्लूचा आजार काही नवीन नाही. त्याच्यावर प्रभावी औषधे, लसही उपलब्ध आहे. मात्र, जनजागृती करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. मोफत मास्कवाटप, औषधोपचार करण्याच्या सगळ्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्याप्रमाणे कोणत्याही रुग्णालयात उपचार करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनाच या आजाराविरोधात लढा द्यावा लागत आहे. त्यासाठी मास्कचा आधार नागरिक घेत आहेत. (प्रतिनिधी)