शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मसाप निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: January 21, 2016 00:56 IST

साहित्य संमेलनाचे सूप वाजल्यानंतर आता साहित्यवर्तुळाला वेध लागले आहेत ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे. संमेलनाइतकीच ही निवडणूकदेखील रंगतदार ठरणार आहे.

पुणे : साहित्य संमेलनाचे सूप वाजल्यानंतर आता साहित्यवर्तुळाला वेध लागले आहेत ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे. संमेलनाइतकीच ही निवडणूकदेखील रंगतदार ठरणार आहे. संमेलनाच्या धामधुमीनंतर पॅनेलच्या मोर्चेबांधणीला चांगलाच वेग येऊ लागला आहे. यंदा परिषदेच्या ३३ जागांसाठी तब्बल ११७ अर्जांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आणि परिषदेच्या कार्याध्यक्षा म्हणून दोन्ही संस्थांवर हुकूमत ठेवलेल्या पहिल्या महिला पदाधिकारी डॉ. माधवी वैद्य यांनी माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३० मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे १५ मार्च रोजी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. यासाठी आता पँनेलच्या स्थापनेसाठी इच्छुकांशी बोलणी सुरू झाली आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये बोगस मतपत्रिका, त्यांची झालेली पळवापळवी या माध्यमातून विद्यमान पदाधिका-यांवर झालेले आरोप आणि धर्मादाय आयुक्तांकडे परिषदेचे माजी कार्याध्यक्ष डॉ. वि.भा देशपांडे यांनी घेतलेली धाव या गोष्टींमुळे साहित्यविश्व ढवळून निघाले होते. किमान तीन पॅनेल निवडणुकीत उतरणार, असे बोलले जात आहे. लेखक प्रा. मिलिंद जोशी, विद्यनाम पदाधिकारी सुनील महाजन, यांच्यासह जुन्या पदाधिकाऱ्यांच्या एका पॅनेलचा समावेश आहे. या पॅनेलमध्ये संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई (पुणे), विजय कोलते (सासवड), भारत देसडला (घुमान) यांचा समावेश आहे. साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांचाही एका पॅनेलमध्ये समावेश आहे. मात्र ते कोणत्या पॅनेलमध्ये असतील हे स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)