शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

मसापची निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य

By admin | Updated: December 24, 2015 00:37 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा ठपका परिषदेचे कायदे सल्लागार अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी ठेवला आहे.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा ठपका परिषदेचे कायदे सल्लागार अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी ठेवला आहे. मतदार याद्या निवडणूक निकालाच्या तीन महिने अगोदर देणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीची फेररचना करावी, अशा आशयाचे निवेदन त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले आहे.पत्रकार परिषदेत आडकर म्हणाले, ‘परिषदेच्या घटनेप्रमाणे कलम ११ऊ नुसार निवडणूक निकालाच्या अगोदर तीन महिने मतदार याद्या कार्यकारी मंडळाने निश्चित व जाहीर करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आवश्यक होते; पण आठ दिवस उशिराने याद्या दिल्या आहेत. परिषदेच्या कार्यकारी मंडळाने यादी संमत करून दिल्यानंतर याद्या द्याव्या लागतात. याचे सूचक, अनुमोदक कोण, याचीही माहिती द्यावी लागते. १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक होते.’ ते म्हणाले, ‘कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह यांनी वेळेत बैठक घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. सभा दि. १५ ऐवजी २१ डिसेंबरला बोलाविली गेली. या बैठकीला कायदे सल्लागार या नात्याने मला बोलाविणे आवश्यक होते; पण मला बैठकीचा निरोप दिला नाही.’ मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांना पत्र दिले आहे. त्याची प्रत अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव आढाव, कार्यकारी विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त उल्हास पवार यांना दिल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)