शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डच्या ‘वाय’ उड्डाणपूलाचा प्रस्तावच रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:12 IST

पुणे : गुलटेकडीच्या पं. नेहरु रस्त्यावरील वखार महामंडळ चौकामध्ये नियोजित करण्यात आलेला ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपूलाची निविदा रद्द करण्यात ...

पुणे : गुलटेकडीच्या पं. नेहरु रस्त्यावरील वखार महामंडळ चौकामध्ये नियोजित करण्यात आलेला ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपूलाची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुला उतरणारा नियोजित पुल रद्द झाला आहे. त्याची लांबी गंगाधाम चौकापर्यंत वाढविण्यात येणार नाही. काम सुरु होण्यापुर्वीच ही प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने खरोखरीच या पुलाची आवश्यकता होती की, केवळ नगरसेवकाच्या अट्टाहासाला प्रशासन बळी पडले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेहरु रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौककडून गंगाधाम चौकाकडे जाताना लागणा-या डायसप्लॉट ते गिरीधर भवन चौकादरम्यान एका उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. हे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार, असल्याने या उड्डाणपूलाची लांबी गंगाधाम चौकापर्यंत वाढवण्याची मागणी व्यापारी आणि स्थानिकांनी केली होती. पालिकेने १५ कोटींच्या ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपुलाचे नियोजन करुन त्याची निविदा काढली. या पुलामुळेही वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याने व्यापा-यांनी करीत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत बैठक घेत लांबी वाढविण्याला प्राधान्य दिले होते. शेवटी प्रकल्प विभागाने वाय आकाराच्या उड्डाणपुलाची निविदा रद्द केली.

===

नियोजित ‘वाय’ उड्डाणपुलाचा तपशील -

लांबी ६०६ मीटर

रुंदी रुंदी ५.५० मिटर

गिरीधर भवन चौकाच्या बाजूस १०० मीटर

गंगाधाम चौकाच्या बाजूस १३० मीटर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस ६६.११ मीटर

===

व्यापारी आणि नागरिकांनी ‘वाय’आकाराच्या उड्डाणपुलामुळे समस्या निर्माण होतील, असे निदर्शनास आणून दिले. त्यांना त्रास नको म्हणून ही प्रक्रिया रद्द केली आहे. वास्तविक अत्यंंत नियोजनबद्ध पद्धतीने हा पूल बांधण्यात येणार होता. परंतु, ज्यांच्यासाठी बांधणार आहोत, त्या नागरिकांनाच नको असेल तर आग्रह धरणार नाही. हा पूल रद्द होण्यात राजकारण आणि अपयश नाही. भविष्यात गंगाधाम चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल केला जाणार आहे.

- श्रीनाथ भिमाले, नगरसेवक

===

नागरिकांचा डायस प्लॉट ते गिरीधर भवन चौक या उड्डाणपुलालाही विरोध होता. त्यातच ‘वाय’ आकाराच्या पुलाचा घाट घालण्यात आला. मुळ वाहतूक कोंडीची समस्या सुटणारच नव्हती तरीही पुलाचा अट्टाहास का केला गेला? कोट्यवधींच्या भ्रष्टाचारासाठी असे चुकीचे प्रकल्प रेटले जातात. आधी पूल बांधायला सुरुवात केल्यानंतर जागा ताब्यात घेण्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. पुलासाठी सर्वेक्षण, नकाशे तयार करताना या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता. केवळ एका नगरसेवकाच्या अट्टाहासाला प्रशासन बळी पडले.

- बाळासाहेब रुणवाल, स्थानिक नागरिक