शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मार्केट यार्डच्या ‘वाय’ उड्डाणपूलाचा प्रस्तावच रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:12 IST

पुणे : गुलटेकडीच्या पं. नेहरु रस्त्यावरील वखार महामंडळ चौकामध्ये नियोजित करण्यात आलेला ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपूलाची निविदा रद्द करण्यात ...

पुणे : गुलटेकडीच्या पं. नेहरु रस्त्यावरील वखार महामंडळ चौकामध्ये नियोजित करण्यात आलेला ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपूलाची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुला उतरणारा नियोजित पुल रद्द झाला आहे. त्याची लांबी गंगाधाम चौकापर्यंत वाढविण्यात येणार नाही. काम सुरु होण्यापुर्वीच ही प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने खरोखरीच या पुलाची आवश्यकता होती की, केवळ नगरसेवकाच्या अट्टाहासाला प्रशासन बळी पडले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेहरु रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौककडून गंगाधाम चौकाकडे जाताना लागणा-या डायसप्लॉट ते गिरीधर भवन चौकादरम्यान एका उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. हे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार, असल्याने या उड्डाणपूलाची लांबी गंगाधाम चौकापर्यंत वाढवण्याची मागणी व्यापारी आणि स्थानिकांनी केली होती. पालिकेने १५ कोटींच्या ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपुलाचे नियोजन करुन त्याची निविदा काढली. या पुलामुळेही वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याने व्यापा-यांनी करीत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत बैठक घेत लांबी वाढविण्याला प्राधान्य दिले होते. शेवटी प्रकल्प विभागाने वाय आकाराच्या उड्डाणपुलाची निविदा रद्द केली.

===

नियोजित ‘वाय’ उड्डाणपुलाचा तपशील -

लांबी ६०६ मीटर

रुंदी रुंदी ५.५० मिटर

गिरीधर भवन चौकाच्या बाजूस १०० मीटर

गंगाधाम चौकाच्या बाजूस १३० मीटर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस ६६.११ मीटर

===

व्यापारी आणि नागरिकांनी ‘वाय’आकाराच्या उड्डाणपुलामुळे समस्या निर्माण होतील, असे निदर्शनास आणून दिले. त्यांना त्रास नको म्हणून ही प्रक्रिया रद्द केली आहे. वास्तविक अत्यंंत नियोजनबद्ध पद्धतीने हा पूल बांधण्यात येणार होता. परंतु, ज्यांच्यासाठी बांधणार आहोत, त्या नागरिकांनाच नको असेल तर आग्रह धरणार नाही. हा पूल रद्द होण्यात राजकारण आणि अपयश नाही. भविष्यात गंगाधाम चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल केला जाणार आहे.

- श्रीनाथ भिमाले, नगरसेवक

===

नागरिकांचा डायस प्लॉट ते गिरीधर भवन चौक या उड्डाणपुलालाही विरोध होता. त्यातच ‘वाय’ आकाराच्या पुलाचा घाट घालण्यात आला. मुळ वाहतूक कोंडीची समस्या सुटणारच नव्हती तरीही पुलाचा अट्टाहास का केला गेला? कोट्यवधींच्या भ्रष्टाचारासाठी असे चुकीचे प्रकल्प रेटले जातात. आधी पूल बांधायला सुरुवात केल्यानंतर जागा ताब्यात घेण्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. पुलासाठी सर्वेक्षण, नकाशे तयार करताना या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता. केवळ एका नगरसेवकाच्या अट्टाहासाला प्रशासन बळी पडले.

- बाळासाहेब रुणवाल, स्थानिक नागरिक