शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

मार्क कमी पडले, आईबाबा ओरडले, काय करू?

By admin | Updated: June 1, 2017 02:37 IST

दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले काय करू? परीक्षेत कमी गुण मिळालेली आणि नापास झालेली मुले आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होती. निकालाच्या दिवशी इतर कुणी नसले तरी किमान पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते; पण मंगळवारी हेल्पलाइनचे कर्मचारीच त्यांचे ‘पालक’ बनले होते... मनातले विचार व्यक्त करण्यासाठी राज्यातील अनेक मुला-मुलींनी हेल्पलाइनचा आधार घेतला. परीक्षेचा निकाल म्हणजे जणू विद्यार्थ्यांसाठी सत्त्वपरीक्षाच असते... परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तर मुले आयुष्य संपविण्यापर्यंत पावले उचलतात, नैराश्य दूर करून त्यांना आधार देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांचीच असते. मात्र त्यांच्या दबावामुळे मुलांमध्ये नैराश्य येते, त्यांचे कुणीतरी ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मन मोकळे करायचे असते. यासाठी ही मुले हेल्पलाइनचा आधार घेतात, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आयुष्यात खूप संधी मिळतील अशा माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जाते, मंगळवारी दिवसभरात २ ते ८ या वेळेत सुमारे २0 ते २५ मुलांनी संपर्क साधला असल्याची माहिती कनेक्टिंग स्वयंसेवी संस्थेचे वीरेन रजपूत यांनी दिली. हेल्पलाइन क्रमांक : अनिल गुंजाळ ९४०४२३५१४५, विरेन कनेक्टिंग एनजीओ १८००२०९४३५३एका माणसाचा फोन आला आणि तू नापास झाला आहेस, पास करायचे असेल तर १३ हजार रुपये भर, असे कुणीतरी एका नाशिकच्या मुलाला सांगितले. खरेच असे असते का? असा भाबडा प्रश्न त्या मुलाने केला... तर दहावीमध्ये ९१ टक्के पडले होते आणि आता बारावीत ५0 टक्के पडले असा एकजण सांगत होता... वाशिम, यवतमाळपासून अनेक भागांमधील मुला-मुलींनी फोन करून आपली भावना व्यक्त केली. नापास झालात किंवा कमी गुण पडले तरी निराश होण्याची आवश्यकता नाही, हीच नवी संधी आहे असे समजा अशा माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करीत असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सहसचिव व समुपदेशक अनिल गुंजाळ यांनी सांगितले.