शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मार्क कमी पडले, आईबाबा ओरडले, काय करू?

By admin | Updated: June 1, 2017 02:37 IST

दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले काय करू? परीक्षेत कमी गुण मिळालेली आणि नापास झालेली मुले आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होती. निकालाच्या दिवशी इतर कुणी नसले तरी किमान पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते; पण मंगळवारी हेल्पलाइनचे कर्मचारीच त्यांचे ‘पालक’ बनले होते... मनातले विचार व्यक्त करण्यासाठी राज्यातील अनेक मुला-मुलींनी हेल्पलाइनचा आधार घेतला. परीक्षेचा निकाल म्हणजे जणू विद्यार्थ्यांसाठी सत्त्वपरीक्षाच असते... परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तर मुले आयुष्य संपविण्यापर्यंत पावले उचलतात, नैराश्य दूर करून त्यांना आधार देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांचीच असते. मात्र त्यांच्या दबावामुळे मुलांमध्ये नैराश्य येते, त्यांचे कुणीतरी ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मन मोकळे करायचे असते. यासाठी ही मुले हेल्पलाइनचा आधार घेतात, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आयुष्यात खूप संधी मिळतील अशा माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जाते, मंगळवारी दिवसभरात २ ते ८ या वेळेत सुमारे २0 ते २५ मुलांनी संपर्क साधला असल्याची माहिती कनेक्टिंग स्वयंसेवी संस्थेचे वीरेन रजपूत यांनी दिली. हेल्पलाइन क्रमांक : अनिल गुंजाळ ९४०४२३५१४५, विरेन कनेक्टिंग एनजीओ १८००२०९४३५३एका माणसाचा फोन आला आणि तू नापास झाला आहेस, पास करायचे असेल तर १३ हजार रुपये भर, असे कुणीतरी एका नाशिकच्या मुलाला सांगितले. खरेच असे असते का? असा भाबडा प्रश्न त्या मुलाने केला... तर दहावीमध्ये ९१ टक्के पडले होते आणि आता बारावीत ५0 टक्के पडले असा एकजण सांगत होता... वाशिम, यवतमाळपासून अनेक भागांमधील मुला-मुलींनी फोन करून आपली भावना व्यक्त केली. नापास झालात किंवा कमी गुण पडले तरी निराश होण्याची आवश्यकता नाही, हीच नवी संधी आहे असे समजा अशा माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करीत असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सहसचिव व समुपदेशक अनिल गुंजाळ यांनी सांगितले.