शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:19 IST

पुणे : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (दि.६) करण्यात आली. ...

पुणे : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (दि.६) करण्यात आली. डॉ. सुरेश सावंत, प्रा. विश्वास वसेकर, ज्योतिराम कदम, डॉ. वैशाली देशमुख आदी साहित्यिकांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सदाशिव पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रसार समिती (हिंदी भवन) येथे ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे व किरण केंद्रे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांनी दिली.

बालकथा विभागात 'रंजक गोष्टी छोट्यांसाठी' या पुस्तकासाठी प्रा. प्रकाश करमरकर (दापोली) आणि 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले' पुस्तकासाठी रमाकांत देशपांडे (नाशिक) यांना विभागून जाहीर झाला आहे. कवितासंग्रह विभागात 'नदी रुसली-नदी हसली' पुस्तकासाठी डॉ. सुरेश सावंत (नांदेड) आणि 'आईचा हात' - अ. म. पठाण (औरंगाबाद) यांना विभागून पुरस्कार दिला जाणार आहे. बालकादंबरी विभागात

'वारुळ' पुस्तकासाठी संजय ऐलवाड (उदगीर) आणि 'माणिक झाला राष्ट्रसंत' पुस्तकासाठी बबन शिंदे (हिंगोली) यांना विभागून पुरस्कार देण्यात येणार आहे. एकांकिका विभागात ' न्याय व खरा धर्म' पुस्तकासाठी ज्योतिराम कदम (पुणे) आणि 'नवी प्रतिज्ञा' पुस्तकासाठी सुनंदा गोरे (औरंगाबाद) यांना विभागून पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच, विज्ञान पुस्तकांसाठीच्या विभागात 'आभाळाचे गुपित' देवबा पाटील (खामगाव) यांना तर समीक्षा विभागात 'बालसाहित्याचे अंतरंग' पुस्तकासाठी प्रा. विश्वास वसेकर (पुणे) आणि 'वाटा आणि वळणे' पुस्तकासाठी प्रा. रामदास केदार (उदगीर) यांना गौरविण्यात येणार आहे. शैक्षणिक विभागात 'टिन एज डॉट.कॉम' पुस्तकासाठी डॉ. वैशाली देशमुख (पुणे), चरित्रात्मक विभागात 'संपादित मुलांसाठी कविता' वीरभद्र मिरेवाड (नांदेड) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

मुलांचे साहित्य या विभागात 'हिरवळ' या पुस्तकासाठी स्नेहल डांगे (सोलापूर) आणि काव्यबन या पुस्तकासाठी गायत्री सूर्यवंशी (लातूर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. परीक्षक म्हणून कविता मेहेंदळे व निर्मला सारडा यांनी काम पाहिले.