शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण रद्द झाले... यात आमची चूक काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निवड प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. परीक्षा पास होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेची गेल्या दीड वर्षापासून वाट पाहतोय, यात आमची चूक ती काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कोणत्याही उमेदवाराचे नुकसान न करता तत्काळ सरसकट नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी यशस्वी उमेदवारांनी केली आहे.

एमपीएससीने २०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. यापैकी ४१३ उमेदवारांची अंतिम निवड केली. यामध्ये एसईबीसी आरक्षणानुसार ४८ जागा राखीव ठेवल्या. जुलै २०१९ मुख्य परीक्षा घेऊन जून २०२० मुलाखती घेऊन अंतिम निकाल लावला. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निकाल लागूनही नियुक्ती देण्यास राज्य सरकाने टाळाटाळ केली. मुख्यमंत्रांच्या बैठकीत नियुक्त्या दिल्या, तर मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियुक्ती अंतिम निकाल लागल्यावर दिला जाईल. असे सांगण्यात आले होते. आता न्यायालयाचा निकालही लागला आहे. त्यामुळे सरकारने अधिकचा वेळ न घेता तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. एसईबीसी आरक्षणानुसार ४८ उमेदवारांचे देखील नुकसान न करता त्यांनाही शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन नियुक्तीत द्यावी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

कोट

आमच्या भविष्याशी खेळ करू नये

राज्य सरकारने नियुक्त्या दिल्या नाहीत, यामध्ये उमेदवारांची काहीच चूक नाही. नियुक्ती हा शब्द एका कागदपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील उमेदवारांचे कष्ट पाहावेत. सर्वच उमेदवारांनी समान कष्ट घेतलेले आहेत. यामध्ये केवळ सरकारचीच चूक आहे. आमच्या भविष्याशी खेळ न करता प्रामाणिकपणे आणि कष्टाने मिळविलेल्या पदावर तत्काळ नियुक्तीत द्यावी, अशी मागणी एका महिला उमेदवारांनी केली.

एसईबीसीच्या जागा खुल्या गटात रूपांतरित करून निकाल तोच ठेवा

एसईबीसी लाभ घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसणार नाही. केवळ एसईबीसी हा शब्द रद्द होऊन खुला गट असे करावे. एसईबीसीच्या जागा खुल्या गटामध्ये रूपांतरित करून निकाल आहे तसेच ठेवावेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही, असे एका उमेदवाराचे म्हणणे आहे.

भावी अधिकारी शेतावर गडी म्हणून राबतात

परीक्षा पास होऊन देखील केवळ नियुक्ती नाही म्हणून आर्थिक गरज भागविण्यासाठी भावी अधिकारी शेतात गडी म्हणून राबत आहे. तर कोणी फळविक्री करीत आहे. तर कोणी खासगी क्लास घेत आहे. तर कोरोनामुळे काम गेल्याने बेरोजगार म्हणून नियुक्तीची वाट पाहतोय.

या परीक्षांवर होऊ शकतो परिणाम

- स्थापत्य अभियांत्रिकी २०१९ , ११६१ पदे (मुलाखती रखडल्या).

- स्थापत्य अभियांत्रिकी २०२०, पूर्व परीक्षा झाली.

- पोलीस उपनिरीक्षक ४६९ पदे (नियुक्त्या रखडल्या).

- पोलीस उपनिरीक्षक २०१९ मुख्य परीक्षा झाली, मैदानी चाचणी प्रतीक्षेत.

- पशुधन विकास अधिकारी ४३५ पदे (नियुक्त्या रखडल्या).

-तालुका न्याय दंडाधिकारी चाळणी परीक्षा झाली.