शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण रद्द झाले... यात आमची चूक काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निवड प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. परीक्षा पास होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेची गेल्या दीड वर्षापासून वाट पाहतोय, यात आमची चूक ती काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कोणत्याही उमेदवाराचे नुकसान न करता तत्काळ सरसकट नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी यशस्वी उमेदवारांनी केली आहे.

एमपीएससीने २०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. यापैकी ४१३ उमेदवारांची अंतिम निवड केली. यामध्ये एसईबीसी आरक्षणानुसार ४८ जागा राखीव ठेवल्या. जुलै २०१९ मुख्य परीक्षा घेऊन जून २०२० मुलाखती घेऊन अंतिम निकाल लावला. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निकाल लागूनही नियुक्ती देण्यास राज्य सरकाने टाळाटाळ केली. मुख्यमंत्रांच्या बैठकीत नियुक्त्या दिल्या, तर मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियुक्ती अंतिम निकाल लागल्यावर दिला जाईल. असे सांगण्यात आले होते. आता न्यायालयाचा निकालही लागला आहे. त्यामुळे सरकारने अधिकचा वेळ न घेता तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. एसईबीसी आरक्षणानुसार ४८ उमेदवारांचे देखील नुकसान न करता त्यांनाही शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन नियुक्तीत द्यावी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

कोट

आमच्या भविष्याशी खेळ करू नये

राज्य सरकारने नियुक्त्या दिल्या नाहीत, यामध्ये उमेदवारांची काहीच चूक नाही. नियुक्ती हा शब्द एका कागदपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील उमेदवारांचे कष्ट पाहावेत. सर्वच उमेदवारांनी समान कष्ट घेतलेले आहेत. यामध्ये केवळ सरकारचीच चूक आहे. आमच्या भविष्याशी खेळ न करता प्रामाणिकपणे आणि कष्टाने मिळविलेल्या पदावर तत्काळ नियुक्तीत द्यावी, अशी मागणी एका महिला उमेदवारांनी केली.

एसईबीसीच्या जागा खुल्या गटात रूपांतरित करून निकाल तोच ठेवा

एसईबीसी लाभ घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसणार नाही. केवळ एसईबीसी हा शब्द रद्द होऊन खुला गट असे करावे. एसईबीसीच्या जागा खुल्या गटामध्ये रूपांतरित करून निकाल आहे तसेच ठेवावेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही, असे एका उमेदवाराचे म्हणणे आहे.

भावी अधिकारी शेतावर गडी म्हणून राबतात

परीक्षा पास होऊन देखील केवळ नियुक्ती नाही म्हणून आर्थिक गरज भागविण्यासाठी भावी अधिकारी शेतात गडी म्हणून राबत आहे. तर कोणी फळविक्री करीत आहे. तर कोणी खासगी क्लास घेत आहे. तर कोरोनामुळे काम गेल्याने बेरोजगार म्हणून नियुक्तीची वाट पाहतोय.

या परीक्षांवर होऊ शकतो परिणाम

- स्थापत्य अभियांत्रिकी २०१९ , ११६१ पदे (मुलाखती रखडल्या).

- स्थापत्य अभियांत्रिकी २०२०, पूर्व परीक्षा झाली.

- पोलीस उपनिरीक्षक ४६९ पदे (नियुक्त्या रखडल्या).

- पोलीस उपनिरीक्षक २०१९ मुख्य परीक्षा झाली, मैदानी चाचणी प्रतीक्षेत.

- पशुधन विकास अधिकारी ४३५ पदे (नियुक्त्या रखडल्या).

-तालुका न्याय दंडाधिकारी चाळणी परीक्षा झाली.