शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मराठा आरक्षण रद्द झाले... यात आमची चूक काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निवड प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. परीक्षा पास होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेची गेल्या दीड वर्षापासून वाट पाहतोय, यात आमची चूक ती काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कोणत्याही उमेदवाराचे नुकसान न करता तत्काळ सरसकट नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी यशस्वी उमेदवारांनी केली आहे.

एमपीएससीने २०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. यापैकी ४१३ उमेदवारांची अंतिम निवड केली. यामध्ये एसईबीसी आरक्षणानुसार ४८ जागा राखीव ठेवल्या. जुलै २०१९ मुख्य परीक्षा घेऊन जून २०२० मुलाखती घेऊन अंतिम निकाल लावला. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निकाल लागूनही नियुक्ती देण्यास राज्य सरकाने टाळाटाळ केली. मुख्यमंत्रांच्या बैठकीत नियुक्त्या दिल्या, तर मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियुक्ती अंतिम निकाल लागल्यावर दिला जाईल. असे सांगण्यात आले होते. आता न्यायालयाचा निकालही लागला आहे. त्यामुळे सरकारने अधिकचा वेळ न घेता तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. एसईबीसी आरक्षणानुसार ४८ उमेदवारांचे देखील नुकसान न करता त्यांनाही शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन नियुक्तीत द्यावी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

कोट

आमच्या भविष्याशी खेळ करू नये

राज्य सरकारने नियुक्त्या दिल्या नाहीत, यामध्ये उमेदवारांची काहीच चूक नाही. नियुक्ती हा शब्द एका कागदपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील उमेदवारांचे कष्ट पाहावेत. सर्वच उमेदवारांनी समान कष्ट घेतलेले आहेत. यामध्ये केवळ सरकारचीच चूक आहे. आमच्या भविष्याशी खेळ न करता प्रामाणिकपणे आणि कष्टाने मिळविलेल्या पदावर तत्काळ नियुक्तीत द्यावी, अशी मागणी एका महिला उमेदवारांनी केली.

एसईबीसीच्या जागा खुल्या गटात रूपांतरित करून निकाल तोच ठेवा

एसईबीसी लाभ घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसणार नाही. केवळ एसईबीसी हा शब्द रद्द होऊन खुला गट असे करावे. एसईबीसीच्या जागा खुल्या गटामध्ये रूपांतरित करून निकाल आहे तसेच ठेवावेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही, असे एका उमेदवाराचे म्हणणे आहे.

भावी अधिकारी शेतावर गडी म्हणून राबतात

परीक्षा पास होऊन देखील केवळ नियुक्ती नाही म्हणून आर्थिक गरज भागविण्यासाठी भावी अधिकारी शेतात गडी म्हणून राबत आहे. तर कोणी फळविक्री करीत आहे. तर कोणी खासगी क्लास घेत आहे. तर कोरोनामुळे काम गेल्याने बेरोजगार म्हणून नियुक्तीची वाट पाहतोय.

या परीक्षांवर होऊ शकतो परिणाम

- स्थापत्य अभियांत्रिकी २०१९ , ११६१ पदे (मुलाखती रखडल्या).

- स्थापत्य अभियांत्रिकी २०२०, पूर्व परीक्षा झाली.

- पोलीस उपनिरीक्षक ४६९ पदे (नियुक्त्या रखडल्या).

- पोलीस उपनिरीक्षक २०१९ मुख्य परीक्षा झाली, मैदानी चाचणी प्रतीक्षेत.

- पशुधन विकास अधिकारी ४३५ पदे (नियुक्त्या रखडल्या).

-तालुका न्याय दंडाधिकारी चाळणी परीक्षा झाली.