शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 2, 2015 23:57 IST

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात तब्बल ९ बिबट्यांची रवानगी करण्यात आल्यामुळे निवारा

लेण्याद्री : मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात तब्बल ९ बिबट्यांची रवानगी करण्यात आल्यामुळे निवारा केंद्र सद्य:स्थितीत हाऊसफुल्ल झाले आहे. सध्या असलेल्या ३६ बिबट्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा पेचप्रसंग व्यवस्थापनाला पडला आहे. निवारा केंद्रात कायमस्वरूपी ठेवण्यात असलेले २७ बिबटे व आता दाखल झालेले ९ बिबटे यामुळे परिस्थिती उद्भवली आहे. तर, बिबट्या प्रवण क्षेत्रात अजूनही काही बिबट्यांचा वावर असल्याने नव्याने पकडलेले काही बिबटे केंद्रात दाखल झाल्यास त्यांच्या निवाऱ्याची, व्यवस्थापनाची अडचण निर्माण होणार आहे.देशात जुन्नर तालुक्यात सर्वांत मोठ्या संख्येने बिबट वन्यप्राण्याची संख्या आढळून आल्याची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. जुन्नर तालुक्याच्या एकूण ५८८६ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी ५७५ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. तर, एकूण २८४३२ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ८१५० हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची शेती करण्यात आलेली आहे. ऊस शेतीच्या माध्यमातून मिळणारा सदाहरित निवारा, पाणी व पाळीव प्राण्याचे भक्षण यामुळे बिबट्यांसाठी ऊसशेती क्षेत्र उत्तम पोषक निवारा झालेला आहे. मनुष्यवस्ती जवळ सहज व जास्त कष्ट न करता बिबट्यास शिकार उपलब्ध होऊ लागल्याने बिबटे वारंवार मनुष्यवस्तीकडे आपला मोर्चा वळवू लागले. यातूनच माणूस व बिबट्या असा संघर्ष सुरू झाला. जुन्नर तालुक्यात सन २००१ पासून बिबट्यांची समस्या निर्माण झाली.मानवीवस्तीत घुसलेले, विहिरीत पडलेले, उपद्रवी नरभक्षक बिबट्यांसाठी सुरुवातीला बंदिस्त, तसेच पत्राशेडमध्ये १६ पिंजरे बनविण्यात आले होते. निवारा केंद्र सन २००६ पासून ‘एसओएस’ या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थेकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आलेले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्या नियोजनातून केंद्राचे व्यवस्थापन केले जाते.