शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

मंगळमोहीम भारतामुळे एक पाऊल पुढे

By admin | Updated: October 21, 2016 04:49 IST

युरोपियन स्पेस एजन्सीने (इसा) हाती घेतलेल्या मंगळमोहिमेमध्ये भारतामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर आॅफ रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सवर

पुणे/नारायणगाव : युरोपियन स्पेस एजन्सीने (इसा) हाती घेतलेल्या मंगळमोहिमेमध्ये भारतामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर आॅफ रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सवर (एनसीआरए) दाखवलेला विश्वास सार्थ ठरला असून, खोडदच्या जीएमआरटी महादुर्बिणीने चोख कामगिरी बजावली आहे. अडीच वर्षांपूर्वी इसाच्या शास्त्रज्ञांनी मंगळयानाच्या मोहिमेतील मंगळयानाचे निरीक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मोठ्या विश्वासाने एनसीआरएवर सोपवली होती. त्यात आपण मोलाची कामगिरी केली आहे, असे मत एनसीआरएचे अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता यांनी व्यक्त केले.या यशाबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोपने (जीएमआरटी) केंद्राचे निर्देशक प्रा. स्वर्णक्रांती घोष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप उपस्थित होते. प्रा. गुप्ता म्हणाले, ‘‘भारताने अशाप्रकारे पहिल्याच प्रकल्पात मिळविलेले यश हा रेडिओ खगोलशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इसाकडून विचारणा झाल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची योग्य ती पडताळणी करुन आपण त्यांना होकार कळविला होता. माझ्यासह चार शास्त्रज्ञ या प्रकल्पावर सातत्याने काम करीत होते. याशिवाय इसामधील दोन शास्त्रज्ञ भारतातून काम पाहत होते. (प्रतिनिधी)नेमका सिग्नल पकडण्याचे आव्हान नेमका सिग्नल पकडणे हे मोठे आव्हान होते. ही सर्व प्रक्रिया दीड तासाची होती. मात्र पहिली २० मिनिटे फ्रिक्वेन्सी मिळविण्यात गेली. त्यानंतर २० सेकंद सिग्नल मिळाले. त्यानंतर सिग्नल मिळणे बंद झाले़ नंतर आठ मिनिटांच्या एकूण कालावधीतील शेवटचे ७० सेकंद अतिशय कठीण होते.- प्रा. यशवंत गुप्ता युरोपने (इसा) मंगळावर सोडलेल्या एक्सोमार्स यानाचे मंगळावर पोहोचल्यानंतर शेवटच्या २० सेकंदांमध्ये सिग्नल मिळत होते़ शेवटच्या क्षणी काय झाले याचा डेटा मिळाल्यानंतरच या यानाचे कार्य सुरू आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे़ जीएमआरटीच्या आधुनिक डिजिटल अ‍ॅँटेनामुळे एक अरब किलोमीटरवरील फ्रिक्वेन्सी मिळविता आली़ तीन दिवसांत पुन्हा सिग्नल मिळतात, की नाही याची माहिती घेण्यात येणार आहे़ - स्टिफन इस्टरहुईझेन, शास्त्रज्ञ, इसाजीएमआरटी करीत असलेले काम युरोपियन स्पेस एजन्सीही करीत होती. मात्र भारताची कामगिरी सरस ठरली. पृथ्वीपासून मंगळावर यान पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने काम केले. - प्रा. स्वर्णक्रांती घोष