शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

पुणे : सावनी रवींद्र हिला ‘बार्डो’ चित्रपटासाठी सर्वोत्क्ृष्ट गायिका तर अक्षय इंडीकरच्या ‘त्रिज्या’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनचा ...

पुणे : सावनी रवींद्र हिला ‘बार्डो’ चित्रपटासाठी सर्वोत्क्ृष्ट गायिका तर अक्षय इंडीकरच्या ‘त्रिज्या’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय नियाज मुजावरच्या ’ताजमहल’ चित्रपटाला ’बेस्ट फिल्म आॅन नँशनल इंटीग्रेशन’ या विभागात तर ’कस्तुरी’ साठी दिग्दर्शक विनोद कांबळे यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, मूळचे सोलापूरचे रहिवासी ़असलेले हे दोघेही एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत.

नवी दिल्ली येथे (दि. २२) ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पुण्यासह सोलापूरच्या दोन माजी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली.

----------------------------------

आमच्या चित्रपटाला कधी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनसाठी मिळाला आहे. खूप भारी वाटत आहे. हा पुरस्कार म्हणजे चांगल्या चित्रपटांना मिळणारी पोचपावती असते. यापूर्वीही माझ्या एका चित्रपटाला आशियातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. नुकताच ‘स्थलपुराण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट पहिल्यानंतर त्याचे कौतुक केले. त्याच आनंदात असताना या राष्ट्रीय पुरस्काराची बातमी मिळाली. त्यामुळे सध्या दुहेरी आनंदात आहोत-- अक्षय इंडीकर, त्रिज्या दिग्दर्शक

-----------------------------------

पुण्यात आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. तेव्हा आमच्या महाविद्यालयाने पुरूषोत्तम करंडक जिंकला होता. त्या नाटकासाठी मला ‘जयराम हर्डीकर करंडक’ मिळाला होता. पुण्यातूनच कलेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर एफटीआयआयमध्ये पटकथा लेखनाचा कोर्स केला. आपण जे काम करू त्याच्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर कधीतरी उमटावी. त्या चित्रपटांच्या मांदियाळीमध्ये आपला चित्रपट असावा ही इच्छा होतीच. ती आज पूर्ण झाली. जो विचार घेऊन सोलापुरातून प्रवास सुरू केला तो राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला याचा आनंद आहे. त्यामुळे आता जबाबदारी खूप वाढली आहे असे वाटते.

-नियाज मुजावर, दिग्दर्शक-पटकथा लेखक

---------------------------------

कस्तुरी या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे खूप भारावून टाकणारे आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (बालचित्रपटासाठी सुवर्णकमळ) म्हणून देशपातळीवर नोंद घेतल्याने कामाचा हुरूप वाढला आहे. एफटीआयआयमध्ये चित्रपट रसास्वादाचे प्रशिक्षण घेतले असून, चित्रपटाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता विविध चित्रपटाच्या कामातून शिकत गेलो. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण बार्शी, सोलापूर या भागातले असून कलाकारही स्थानिक आहेत.

-विनोद कांबळे, दिग्दर्शक

-------