शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

पुणे : सावनी रवींद्र हिला ‘बार्डो’ चित्रपटासाठी सर्वोत्क्ृष्ट गायिका तर अक्षय इंडीकरच्या ‘त्रिज्या’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनचा ...

पुणे : सावनी रवींद्र हिला ‘बार्डो’ चित्रपटासाठी सर्वोत्क्ृष्ट गायिका तर अक्षय इंडीकरच्या ‘त्रिज्या’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय नियाज मुजावरच्या ’ताजमहल’ चित्रपटाला ’बेस्ट फिल्म आॅन नँशनल इंटीग्रेशन’ या विभागात तर ’कस्तुरी’ साठी दिग्दर्शक विनोद कांबळे यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, मूळचे सोलापूरचे रहिवासी ़असलेले हे दोघेही एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत.

नवी दिल्ली येथे (दि. २२) ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पुण्यासह सोलापूरच्या दोन माजी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली.

----------------------------------

आमच्या चित्रपटाला कधी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनसाठी मिळाला आहे. खूप भारी वाटत आहे. हा पुरस्कार म्हणजे चांगल्या चित्रपटांना मिळणारी पोचपावती असते. यापूर्वीही माझ्या एका चित्रपटाला आशियातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. नुकताच ‘स्थलपुराण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट पहिल्यानंतर त्याचे कौतुक केले. त्याच आनंदात असताना या राष्ट्रीय पुरस्काराची बातमी मिळाली. त्यामुळे सध्या दुहेरी आनंदात आहोत-- अक्षय इंडीकर, त्रिज्या दिग्दर्शक

-----------------------------------

पुण्यात आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. तेव्हा आमच्या महाविद्यालयाने पुरूषोत्तम करंडक जिंकला होता. त्या नाटकासाठी मला ‘जयराम हर्डीकर करंडक’ मिळाला होता. पुण्यातूनच कलेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर एफटीआयआयमध्ये पटकथा लेखनाचा कोर्स केला. आपण जे काम करू त्याच्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर कधीतरी उमटावी. त्या चित्रपटांच्या मांदियाळीमध्ये आपला चित्रपट असावा ही इच्छा होतीच. ती आज पूर्ण झाली. जो विचार घेऊन सोलापुरातून प्रवास सुरू केला तो राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला याचा आनंद आहे. त्यामुळे आता जबाबदारी खूप वाढली आहे असे वाटते.

-नियाज मुजावर, दिग्दर्शक-पटकथा लेखक

---------------------------------

कस्तुरी या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे खूप भारावून टाकणारे आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (बालचित्रपटासाठी सुवर्णकमळ) म्हणून देशपातळीवर नोंद घेतल्याने कामाचा हुरूप वाढला आहे. एफटीआयआयमध्ये चित्रपट रसास्वादाचे प्रशिक्षण घेतले असून, चित्रपटाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता विविध चित्रपटाच्या कामातून शिकत गेलो. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण बार्शी, सोलापूर या भागातले असून कलाकारही स्थानिक आहेत.

-विनोद कांबळे, दिग्दर्शक

-------