शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

माळीणकरांना हवीत शासनामार्फतच घरे

By admin | Updated: May 4, 2015 02:57 IST

: माळीण पुनर्वसनासाठी सोसायटी स्थापन करणे ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. अजून सहा महिने लागले तरी चालतील, पण घरे शासनामार्फतच होऊ द्या.

घोडेगाव : माळीण पुनर्वसनासाठी सोसायटी स्थापन करणे ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. अजून सहा महिने लागले तरी चालतील, पण घरे शासनामार्फतच होऊ द्या. महसूलमंत्र्यांनी लागेल तेवढा निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मग आता दोन लाख रुपये घरकुलासाठी मंजूर असल्याचे शासन कसे काय म्हणते? आम्हाला ५०० चौरस फुटांचे घर पाहिजे, असे परखड मत माळीण ग्रामस्थांनी पुनर्वसनाबाबत घोडेगाव येथे आयोजित बैठकीत व्यक्तकेले.माळीण ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी शासनाने दोन लाख रुपये एका घरकुलासाठी मंजूर केले आहेत. तर, अजून जादा ५ लाख रुपये घरकुलासाठी लागणार आहेत. हे पाच लाख रुपये वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांनी जाहीर केलेल्या मदतीतून गोळा करायचे व घरकुले बांधायची, असा पर्याय जिल्हाधिकारी यांनी काढला. मात्र, हे पाच लाख रुपये गोळा करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी अगर तहसीलदार यांना नाही. यासाठी शासनाची परवानगी लागते. शासन अशा प्रकारे परवानगी देत नाही. यासाठी स्थानिक ग्रामस्थांची सोसायटी निर्माण करून हा निधी एनजीओकडून सोसायटीकडे घ्यायचा, तसेच शासनाचे दोन लाख रुपयेदेखील सोसायटीकडे द्यायचे व घरकुले बांधायची. यासाठी सोसायटीनेच कॉन्ट्रॅक्टर नेमायचा, असा प्रस्ताव या बैठकीत तहसीलदार बी.जी.गोरे यांनी मांडला. आमच्या पुनर्वसनाची फरफट करू नये, अशी विनंती काही ग्रामस्थांनी केली. या वेळी तहसीलदार बी. जी. गोरे, माळीण पुनर्वसनाचे आर्किटेक योगेश राठी, नायब तहसीलदार विजय केंगले, धनंजय भांगरे, ग्रामस्थ जगन्नाथ अंकुश, सुहास झांजरे, कमाजी पोटे, तुकाराम लेंभे, सखाराम विरणक, चंद्रकांत दांगट, ज्ञानेश्वर पोटे, पी. एच. विरणक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)