शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

माळीणकरांना मिळाला तात्पुरता निवारा

By admin | Updated: October 6, 2014 06:44 IST

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले

घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले. प्रथम प्राथमिकता असलेल्यांना ही घरे दिली असून कमी पडलेली घरे लवकरच दिली जाणार आहेत. मात्र ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याची तात्पुरती निवारा शेड बांधण्यात आली आहेत. एकूण ३२ शेडची आवश्यकता असताना येथे कमी जागा उपलब्ध झाल्याने २५ शेड उभी करण्यात आली. आसाणे आश्रमशाळेत राहणारे तसेच माळीण परिसरात नातेवाइकांच्या आश्रयास असलेले अथवा खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राथमिकतेने घरे देण्यात आली, तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना मागे ठेवण्यात आले. मात्र, या वेळी ज्यांना शेड मिळाली नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त करीत दिवाळीपर्यंत घरे मिळाली नाहीत तर आम्ही वेगळा पवित्रा घेऊ, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘ज्यांना प्रथम गरज आहे, त्यांना ही घरे दिली आहेत. शेड बांधण्याचे काम बंद केलेले नाही. उर्वरित कुटुंबांना लवकरच शेड देण्यात येतील. कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. तसेच हा तात्पुरता निवारा आहे. ७२ पक्की घरे बांधायची असून त्यासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. ही जागा मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. हा प्रश्न सुटल्याबरोबर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. यामध्ये रस्ते, लाईट, पाण्यापासून १८ प्रकारच्या नागरी सोई-सुविधा देण्याची दक्षता आम्ही घेणार आहोत. निवडणुकीनंतर या कामाला गती देणार आहोत.’या वेळी प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, विवेक महाराव, गटविकास अधिकारी विवेक इलमे, उपअभियंता एस. बी. देवढे, सहायक प्रकल्प अधिकारी सी. डी. मोरे, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे उपस्थित होते. गोविंद झांजरे, सोनाबाई अंकुश, हरिश्चंद्र झांजरे अशा ७ कुटुंबांना घरे मिळाली नाहीत. (वार्ताहर)