शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

माळीणकरांना मिळाला तात्पुरता निवारा

By admin | Updated: October 6, 2014 06:44 IST

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले

घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले. प्रथम प्राथमिकता असलेल्यांना ही घरे दिली असून कमी पडलेली घरे लवकरच दिली जाणार आहेत. मात्र ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याची तात्पुरती निवारा शेड बांधण्यात आली आहेत. एकूण ३२ शेडची आवश्यकता असताना येथे कमी जागा उपलब्ध झाल्याने २५ शेड उभी करण्यात आली. आसाणे आश्रमशाळेत राहणारे तसेच माळीण परिसरात नातेवाइकांच्या आश्रयास असलेले अथवा खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राथमिकतेने घरे देण्यात आली, तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना मागे ठेवण्यात आले. मात्र, या वेळी ज्यांना शेड मिळाली नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त करीत दिवाळीपर्यंत घरे मिळाली नाहीत तर आम्ही वेगळा पवित्रा घेऊ, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘ज्यांना प्रथम गरज आहे, त्यांना ही घरे दिली आहेत. शेड बांधण्याचे काम बंद केलेले नाही. उर्वरित कुटुंबांना लवकरच शेड देण्यात येतील. कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. तसेच हा तात्पुरता निवारा आहे. ७२ पक्की घरे बांधायची असून त्यासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. ही जागा मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. हा प्रश्न सुटल्याबरोबर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. यामध्ये रस्ते, लाईट, पाण्यापासून १८ प्रकारच्या नागरी सोई-सुविधा देण्याची दक्षता आम्ही घेणार आहोत. निवडणुकीनंतर या कामाला गती देणार आहोत.’या वेळी प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, विवेक महाराव, गटविकास अधिकारी विवेक इलमे, उपअभियंता एस. बी. देवढे, सहायक प्रकल्प अधिकारी सी. डी. मोरे, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे उपस्थित होते. गोविंद झांजरे, सोनाबाई अंकुश, हरिश्चंद्र झांजरे अशा ७ कुटुंबांना घरे मिळाली नाहीत. (वार्ताहर)