शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

एकाच दिवशी ३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूने मलठण हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:10 IST

कान्हूर मेसाई : ...

कान्हूर मेसाई : दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने झालेल्या मृत्यूच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच, आज मलठण येथे ३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूने मलठण पुन्हा हादरले. लोकांची बेपर्वाई, निष्काळजीपणा आणि प्रशासन करीत असलेल्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष यामुळे मलठण येथे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर उपाय म्हणून संपूर्ण मलठण बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला असून, त्याची कडक अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. ह्या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्कालीन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याचा इशारा सरपंच शशिकला फुलसुंदर, पोलीस पाटील अर्चना थोरात, मंडल अधिकारी प्रशांत शेटे, ग्रामविकास अधिकारी विलास शिंदे यांनी दिला आहे. तशा आशयाचे पत्र ताडतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य अनिल शिंदे व ग्रामपंचायत सदस्या राणीताई मुकुंद नरवडे यांनी सांगितले की, गुरुवारच्या रात्री पेन्शनर संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते भानुदास साळवे, लाखेवाडी येथील रंगनाथ कुंडलिक सकपाळ व सुनंदा मारुती कोठावळे या तिघांचाही कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मलठण गावामध्ये कोरोनाने १३ जणांचा बळी गेला आहे. मात्र, एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू झाल्याने गंभीर परिस्थितीची जाणीव होत आहे. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नरवडे यांनी सांगितले की, काही कोरोनाबधित रुग्ण राजरोसपणे गावात फिरताना दिसतात. गंभीर परिस्थितीची जाणीव देऊनही ते डोळेझाक करतात. लाखेवाडी ह्या छोटयाशा वाडीत अनेक कोरोनाबाधित असूनही आजार अंगावर काढणे, वेळेत डॉक्टरी उपचार न घेणे व विलगीकरणात न रहाणे असे प्रकार होताना दिसतात. त्याची परिणती म्हणून आज २ रुग्ण दगावले. एकंदरीत, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन करीत आहे.

आजपासून गावातील सर्व व्यवहार दि. १७ मेपर्यंत पूर्ण बंद राहतील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.