शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून समृद्धी गाव योजना यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे ...

सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे जल समृद्ध झाली आहेत. गावच्या पाणी पातळीत वाढ झाली, परंतु, या पुढील काळात पाण्याचा काळजीपूर्वक योग्य वापर केला पाहिजे, यासाठी आगामी समृद्ध गाव योजनेच्या माध्यमातून विकासकामांचे मायक्रो प्लॅनिंग करावे आणि लोक सहभाग घेऊन योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड पंचायत समितीमध्ये बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, विभागीय अधिकारी आबासो लाड, तालुका समन्वयक मयूर साळुंखे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, सदस्य रमेश जाधव, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता ए. एस. दिलपाक, वनपरीक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप, त्याच प्रमाणे विविध विभागांचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, आगामी स्पर्धेतील १४ गावांचा आराखडा तयार करून कामांची आखणी करावी. प्रत्येक गावाला एक नोडल अधिकारी नियुक्त करून सर्वांमध्ये समन्वय ठेवावा. दर आठवड्याला आढावा बैठक घेवून तो आढावा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे द्यावा. अधिकाऱ्यांनी गाव भेटी करून गावकऱ्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करावीत. कोणत्याही निधीची कमतरता जाणवू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले की, ७६ तालुक्यांपर्यंत ही योजना पोहोचली असून आता ३९ तालुक्यातील ९५६ गावांत ही स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून यामध्ये ग्रामसभा घेवून जलसंधारणाबरोबरच पिकांचे नियोजन, गवत लावणे, फळबागा लागवड, वृक्ष लागवड, भूजलाचा अभ्यास करणे, गावचे सर्वेक्षण करून गावातील जैवविविधता, पक्षी, प्राणी, पशु यांची माहिती, राहणीमान यांचा अभ्यास केला जाणार आहे.

शेत तळ्याच्या कडेला वृक्ष लागवड केली जाणार आहे. शेती गट स्थापन करणे, विविध फळे, पालेभाज्या यांचे उत्पादन केले जाणार आहे.

तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले कि, स्पर्धेतील १४ गावांमध्ये १३ कोटी रुपयांची २४८० कामे नियोजित केली आहेत. गाव पातळीवर भेटी देवून सर्व योजना त्यांच्यापर्यंत नेण्यात येतील, कामांचे वेळापत्रक तयार करून प्राधान्याने कामे करण्यात येईल.

०६ सासवड

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.