शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून समृद्धी गाव योजना यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे ...

सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे जल समृद्ध झाली आहेत. गावच्या पाणी पातळीत वाढ झाली, परंतु, या पुढील काळात पाण्याचा काळजीपूर्वक योग्य वापर केला पाहिजे, यासाठी आगामी समृद्ध गाव योजनेच्या माध्यमातून विकासकामांचे मायक्रो प्लॅनिंग करावे आणि लोक सहभाग घेऊन योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड पंचायत समितीमध्ये बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, विभागीय अधिकारी आबासो लाड, तालुका समन्वयक मयूर साळुंखे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, सदस्य रमेश जाधव, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता ए. एस. दिलपाक, वनपरीक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप, त्याच प्रमाणे विविध विभागांचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, आगामी स्पर्धेतील १४ गावांचा आराखडा तयार करून कामांची आखणी करावी. प्रत्येक गावाला एक नोडल अधिकारी नियुक्त करून सर्वांमध्ये समन्वय ठेवावा. दर आठवड्याला आढावा बैठक घेवून तो आढावा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे द्यावा. अधिकाऱ्यांनी गाव भेटी करून गावकऱ्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करावीत. कोणत्याही निधीची कमतरता जाणवू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले की, ७६ तालुक्यांपर्यंत ही योजना पोहोचली असून आता ३९ तालुक्यातील ९५६ गावांत ही स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून यामध्ये ग्रामसभा घेवून जलसंधारणाबरोबरच पिकांचे नियोजन, गवत लावणे, फळबागा लागवड, वृक्ष लागवड, भूजलाचा अभ्यास करणे, गावचे सर्वेक्षण करून गावातील जैवविविधता, पक्षी, प्राणी, पशु यांची माहिती, राहणीमान यांचा अभ्यास केला जाणार आहे.

शेत तळ्याच्या कडेला वृक्ष लागवड केली जाणार आहे. शेती गट स्थापन करणे, विविध फळे, पालेभाज्या यांचे उत्पादन केले जाणार आहे.

तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले कि, स्पर्धेतील १४ गावांमध्ये १३ कोटी रुपयांची २४८० कामे नियोजित केली आहेत. गाव पातळीवर भेटी देवून सर्व योजना त्यांच्यापर्यंत नेण्यात येतील, कामांचे वेळापत्रक तयार करून प्राधान्याने कामे करण्यात येईल.

०६ सासवड

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.