शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
4
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
5
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
6
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
7
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
8
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
9
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
10
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
11
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
12
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
13
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
14
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
15
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
16
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
17
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
18
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
19
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
20
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...

लोकसहभागातून समृद्धी गाव योजना यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे ...

सासवड : मागील वर्षात पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यामुळे अनेक गावे जल समृद्ध झाली आहेत. गावच्या पाणी पातळीत वाढ झाली, परंतु, या पुढील काळात पाण्याचा काळजीपूर्वक योग्य वापर केला पाहिजे, यासाठी आगामी समृद्ध गाव योजनेच्या माध्यमातून विकासकामांचे मायक्रो प्लॅनिंग करावे आणि लोक सहभाग घेऊन योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड पंचायत समितीमध्ये बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, विभागीय अधिकारी आबासो लाड, तालुका समन्वयक मयूर साळुंखे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, सदस्य रमेश जाधव, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता ए. एस. दिलपाक, वनपरीक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप, त्याच प्रमाणे विविध विभागांचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, आगामी स्पर्धेतील १४ गावांचा आराखडा तयार करून कामांची आखणी करावी. प्रत्येक गावाला एक नोडल अधिकारी नियुक्त करून सर्वांमध्ये समन्वय ठेवावा. दर आठवड्याला आढावा बैठक घेवून तो आढावा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे द्यावा. अधिकाऱ्यांनी गाव भेटी करून गावकऱ्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करावीत. कोणत्याही निधीची कमतरता जाणवू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले की, ७६ तालुक्यांपर्यंत ही योजना पोहोचली असून आता ३९ तालुक्यातील ९५६ गावांत ही स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून यामध्ये ग्रामसभा घेवून जलसंधारणाबरोबरच पिकांचे नियोजन, गवत लावणे, फळबागा लागवड, वृक्ष लागवड, भूजलाचा अभ्यास करणे, गावचे सर्वेक्षण करून गावातील जैवविविधता, पक्षी, प्राणी, पशु यांची माहिती, राहणीमान यांचा अभ्यास केला जाणार आहे.

शेत तळ्याच्या कडेला वृक्ष लागवड केली जाणार आहे. शेती गट स्थापन करणे, विविध फळे, पालेभाज्या यांचे उत्पादन केले जाणार आहे.

तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले कि, स्पर्धेतील १४ गावांमध्ये १३ कोटी रुपयांची २४८० कामे नियोजित केली आहेत. गाव पातळीवर भेटी देवून सर्व योजना त्यांच्यापर्यंत नेण्यात येतील, कामांचे वेळापत्रक तयार करून प्राधान्याने कामे करण्यात येईल.

०६ सासवड

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.