शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फसवणूक झाल्याने भरपाई द्या

By admin | Updated: January 20, 2015 00:48 IST

बँकाना ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे.

पुणे : आॅनलाईन बँकिंगद्वारे पुण्यातील एका कंपनीची ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधित रक्कम हस्तांतरित झालेल्या बँकाना ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे. सुरक्षेसाठी बँकांना घालून दिलेले केवायसी नॉर्म पाळण्याची वेळीच काळजी न घेतल्याने तसेच वोडाफोन कंपनीने नवे सिमकार्ड देतानाही कागदपत्रांची पाहणी न केल्याचा बँक व सिमकार्ड कंपनीला भुर्दंड बसला आहे.या प्रकरणी धनलक्ष्मी बँकेने १८ लाख, एसबीआय बँकेने २ लाख, एसबीआय पटियाला बँकेने ७.५ लाख, पंजाब नॅशनल बँकेने ७ लाख आणि वोडाफोन कंपनीने फिर्यादीला १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल देण्यात आला आहे. याप्रकरणी सुहास एंटरप्रायझेसतर्फे सुहास मानकामे यांनी फिर्याद दाखल केली होती. फियार्दीतर्फे अ‍ॅड. गौरव जाचक यांनी माहिती तंत्रज्ञान सचिवांपुढे दावा दाखल केला होता.सुहास एंटरप्रायझेसचे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये एक कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट अकाऊंट होते. आॅनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक करून त्यांच्या खात्यातून ७९ लाख २७ हजार रुपये काढून घेण्यात आले होते. त्यातील ३१ लाख २६ हजार रुपयांची रक्कम बँकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर लगेच गोठविण्यात आली होती.फिर्यादी यांच्या खात्यातून फसवून काढून घेण्यात आलेली रक्कम जयपूर, लखनौ, गाझियाबाद येथील बँकांमध्ये वर्ग झाली होती. (प्रतिनिधी)४फसवणूक करून काढून घेण्यात आलेली रक्कम परत मिळावी म्हणून फिर्यादी यांनी दावा दाखल केला होता. बँकेने फियार्दीच्या खात्यातून रक्कमेच्या सुरक्षेसाठी बँकांना घालून दिलेले केवायसी नॉर्मस पाळले नाहीत. तसेच वोडाफोन कंपनीने नवे सिमकार्ड देताना कागदपत्रांची पाहणी केली नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. जाचक यांनी केला.