शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

इतिहासाबद्दल आपुलकी निर्माण करावी

By admin | Updated: May 23, 2017 05:01 IST

माधव जोशी म्हणाले, की आपल्या संस्कृतीमध्ये स्थापत्य, साहित्य, चित्र, काव्य, कला अशा अनेक माध्यमांतून इतिहासाचे अस्तित्व आणि भव्यता सामावली आहे.

माधव जोशी म्हणाले, की आपल्या संस्कृतीमध्ये स्थापत्य, साहित्य, चित्र, काव्य, कला अशा अनेक माध्यमांतून इतिहासाचे अस्तित्व आणि भव्यता सामावली आहे. मात्र, याबाबत निष्ठेने व श्रद्धेने होणारा अभ्यास कमी होऊ लागला आहे. ठराविक लोकांकडेच माहिती उपलब्ध असते. ही माहिती फक्त स्वत:जवळ ठेवून मारण्यापेक्षा इतरांना देऊन प्रवाहित करणे जास्त योग्य ठरू शकते. प्रवाहित असणाऱ्या माहितीमुळे त्यामध्ये अधिकाधिक संशोधन होऊ शकते. त्याचा परिणाम असा, की हे संशोधन सत्याच्या जवळ जाण्यास मदत करेल. बारामतीमधील कविवर्य मोरोपंतांच्या आर्यांशिवाय त्या काळात कीर्तन रंगत नसे. अहंकार दुखावल्याने पेशव्यांनी दोन वर्षांकरिता मोरोपंतांच्या आर्या कीर्तनात वापरण्यास बंदी घातली. मात्र, त्याचा परिणाम कीर्तनकारांवर झाला. कीर्तनकारांनी पेशव्यांना आर्या म्हणू देण्याची विनंती केली. त्याशिवाय कीर्तन रंगत नसल्याचेही सांगितले.शेवटी पेशव्यांनी आपला बंदी हुकूम मागे घेतला. मोरोपंतांचे काव्य आणि त्यांच्या आर्या मराठी भाषेचे एक अभिजात स्वरूप आहेत. मात्र, याच मोरोपंतांच्या काव्याचा अभ्यास त्यामानाने केला गेला नाही. फक्त मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्यासाठी एक कक्ष आहे. हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे, अशा अनेक ऐतिहासिक साहित्य आणि अवशेषांबद्दल शासकीय, राजकीय, सामाजिक उदासीनता मोठी आहे. त्याबाबत विचार करणे सोडाच; परंतु कोणी बोलतदेखील नाही.कित्येक ऐतिहासिक स्थळे की जी आपला देदीप्यमान इतिहास अंगाखांद्यांवर मिरवत आहेत, आज ती अखेरच्या घटका मोजत आहेत.गावागावांमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा दिसतात. ऐतिहासिक शोधकार्य फक्त इतिहास अभ्यासकांपुरतेच मर्यादित न राहता, सहजगत्या सर्वसामान्यांच्या भाषेत पुढे यायला हवे. हेमाडपंती मंदिरे व त्याभोवती असणाऱ्या भग्नावशेषांमधून त्या-त्या परिसराच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्यास मदत होईल. यातून खऱ्या अर्थाने त्या वेळचा समाज आणि कार्यपद्धती पुढे येईल.वारसास्थळांचे महत्त्व व त्याचा इतिहास सांगिल्यास त्यांच्या ऐतिहासिक जाणिवा तयार होतील. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि इतिहासतज्ज्ञांनी या युवकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. इतिसाहस संशोधक संस्थांमधून शेकडो ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. संशोधनासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संयम, अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. यासाठी सुजाण नागरिकांनी पुढे आले पाहिजे. पुणे जिल्ह्याच्या कोणत्याही गावात गेले तरी तेथे एखादे का होईना, हेमाडपंती मंदिर अढळते. ही मंदिरे ६०० ते ७०० वर्षे जुनी, तर काही मंदिरे अगदी हजारो वर्षे जुनी आहेत. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून आजही हीमंदिरे ओळखली जातात. त्यांची रचना, त्यांवरील कलाकुसर, तंत्र याबाबत सर्वसामन्यांना माहिती नसते. त्यामुळे अनेक वेळा अज्ञानातून स्थानिकांकडूनच या वास्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे थांबायला हवे. ऐतिहासिक वास्तूंबद्दल अभिमान वाटायला हवा. त्यांचे महत्त्व स्थानिकांना सर्वांत आधी पटवून सांगायला हवे. तसे केल्यास पर्यटकांकडून होणारे नुकसान टळेल. स्थानिक व्यक्तीच अशा प्रकारांना आळा घालतील. आपल्या परिसरातील अनेक ऐतिहासिक ठिकाणे चांगली पर्यटनस्थळे म्हणून समोर येऊ शकतात. शासन, प्रशासन, स्थानिक नागरिक आणि सुजाण युवक यांच्यावरच ही भिस्त आहे.