शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बहुसंख्य पदपथ विक्रेत्यांकडून गिळंकृत

By admin | Updated: May 11, 2016 01:16 IST

शहरातील बहुसंख्य रस्त्यांवरचे पदपथ (फूटपाथ) पथारीवाले, टपरीवाले यांनी गिळंकृत करून टाकले आहेत. त्यावरून चालण्याचा पहिला हक्क असलेल्या पादचाऱ्यांना त्यामुळे रस्त्यावर वाहनांमधून कसरत

पुणे : शहरातील बहुसंख्य रस्त्यांवरचे पदपथ (फूटपाथ) पथारीवाले, टपरीवाले यांनी गिळंकृत करून टाकले आहेत. त्यावरून चालण्याचा पहिला हक्क असलेल्या पादचाऱ्यांना त्यामुळे रस्त्यावर वाहनांमधून कसरत करीत चालावे लागत आहे. पदपथ मोकळे करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून महापालिकेचे विविध विभाग यातून हात झटकण्याचाच प्रयत्न करीत आहेत. शहरात सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे पदपथ आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पादचाऱ्यांसाठी म्हणून ही जागा ठेवली जाते. रस्ता मोठा असेल तर पदपथाची रुंदी साधारण १० फूट व लहान असेल तर किमान ४ फूट असते. गर्दीच्या तसेच उपनगरांमधील प्रत्येक मोठ्या रस्त्यांना असे पदपथ आहेत. रस्त्याने वाहनांची गर्दी असते. पायी चालणाऱ्यांना सुरक्षित वाटावे, वृद्ध अथवा लहान मुलांना चालणे सोयीचे व्हावे यासाठी असे पदपथ असतात. असे बहुसंख्य पदपथ गेली अनेक वर्षे विविध प्रकारच्या लहानमोठ्या विक्रेत्यांनीच व्यापले आहेत. पादचाऱ्यांना हे विक्रेते व त्यांच्या ग्राहकांची गर्दी यातून मार्ग काढत पायी चालावे लागते. बाजारपेठेतील रस्त्यांवर तर हे प्रमाण इतके आहे की विक्रेत्यांच्या गर्दीत पदपथ हरवूनच गेले आहेत.काही रस्त्यांवर पदपथांच्या कडेला असणारे दुकानदार, व्यावसायिक तिथे विक्रेत्यांना येऊ देत नाहीत. मात्र असे करताना ते त्यांच्या दुकानातील बराचसा माल थेट पदपथावरच लावून ठेवतात. कपडे असतील तर ते पदपथावर लटकते राहतील अशा हँगर्सना अडकवून ठेवले जातात. भांडी किंवा फोटो फ्रेम्स असतील तर त्याची पदपथावर आकर्षक मांडणी केली जाते. यामुळेही अनेक रस्त्यांवरचे पदपथ दिसेनासे झाले आहेत. पादचाऱ्यांना त्यावरू पायी चालणे अवघड झाले आहे. विशेषत: पदपथ ५ फूट रुंदीचा असेल तर तिथे पादचाऱ्याला रस्त्यावरून चालण्याशिवाय दुसरा पर्यायच राहात नाही.नगरसेवकांच्या आग्रहातून अलीकडे बहुसंख्य पदपथांवर रंगीत पेविंग ब्लॉक बसविले जातात. खड्ड्यांची संख्या वाढली की नगरसेवक पुन्हा त्यावर दुसरे ब्लॉक बसविण्याचा प्रस्ताव देतो. ते काम करण्यासाठी ठेकेदार तयारच असतात. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे नवे ब्लॉक्स बसतात, ते उखडतात, परत नवे बसविले जातात.लहान-मोठ्या सर्व रस्त्यांवरचे पदपथ असे अतिक्रमणांच्या जाळ्यात सापडले असतानाही महापालिकेला मात्र त्याच्याशी काही सोयरसूतक नसल्याचेच दिसते आहे. पथविभागाचे म्हणणे असे, की आमचे काम पदपथ तयार करण्याचे आहे, त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे नाही. अतिक्रमणविरोधी विभागाचे म्हणणे असे, की आमच्याकडे पदपथावर अतिक्रमण झाले आहे अशी तक्रार तर यायला हवी. महापालिकेत अतिक्रमणे काढण्यासाठीच म्हणून असलेल्या खास पोलीस चौकीतील अधिकारी, पोलीस सांगतात, की अतिक्रमण विभागाने सांगितल्याशिवाय स्वत:होऊन आम्ही काहीही करू शकत नाही. अशी काही समस्या असल्याचे पदाधिकारी, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी यांना माहितीही नाही.