शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

महावितरण आपल्या गावात

By admin | Updated: December 4, 2015 02:41 IST

महिन्यातील एका गुरुवारी एका गावात जाऊन तेथील विजेबाबतच्या सर्व समस्या सोडविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्युत महावितरणने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोणी कंद, थेऊर

पुणे : महिन्यातील एका गुरुवारी एका गावात जाऊन तेथील विजेबाबतच्या सर्व समस्या सोडविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्युत महावितरणने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोणी कंद, थेऊर, कापूरहोळ व खानापूर या गावांत आज हा उपक्रम राबविला असून, त्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.भोर, वेल्हा, पुरंदर व हवेलीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर या तालुक्यात सुरू झाला आहे. पवार यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याची माहिती दिली.महावितरणने विजेच्या समस्या सोडविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यात प्रत्येक गुरुवारी एक गाव घेऊन त्या विभागातील सर्व मनुष्यबळ त्या गावात घेऊन जाऊन तेथे एकाच दिवसात समस्या सोडविल्या जाणार आहेत.ही अभिनव कल्पना असून, महाराष्ट्रात प्रथमच येथे राबविण्यात येत आहे. खेड व बारामती विभागांशीही आमची चर्चा झाली असून, तेथेही ती राबविता येईल, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे पवार यांनी या वेळी सागितले. आज पहिल्याच गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या लोणीकंद या गावात कंद यांच्या हस्ते या उपक्रमाला प्रारंभ झाला. तसेच थेऊर, कापूरहोळ व खानापूर येथे महावितरणच्या टीमने तेथील सर्व समस्या सोडविल्या. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सर्वसाधरण सभेतही या उप्रकमाचे सदस्यांनी कौतुक केले. आमच्या तालुक्यातही हा उपक्रम राबवा, अशी विनंती केली. काही सदस्यांनी महिन्याला एक गाव घेतले, तर जिल्ह्यातील सर्व गावांतील ससम्या सुटायला वेळ लागेल, अशी शंका उपस्थित केली. यावर पवार यांनी पाच-पाच गावांत घेऊ, असे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सदस्यांनी सुरुवातील आपल्या गावांत हा उपक्रम राबवावा, असे सांगितले. (प्रतिनिधी)या उपक्रमामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. सामान्य जनतेला यामुळे दिलासा मिळेल. जसे निर्मल ग्राम ही शासनाची योजना आहे, तसे महावितरण आपल्या दारात जाऊन तेथील प्रश्न सोडविणार आहे. आमच्या गावातील अनेक प्रश्न आज निकाली निघाले.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद