शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

महात्मा फुले यांच्यामुळेच महिलांना प्रतिष्ठा : गौरी कुंजीर

By admin | Updated: November 28, 2014 23:13 IST

‘‘महात्मा जोतिबा फुलेंनी राबविलेल्या महिला शिक्षण धेरणामुळेच महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळेच आम्ही महिला व्यासपीठावर दिसत आहे.

खळद : ‘‘महात्मा जोतिबा फुलेंनी राबविलेल्या महिला शिक्षण धेरणामुळेच महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळेच आम्ही महिला व्यासपीठावर दिसत आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण समाजाचे काही तरी देणं लागतो, या भावनेतून त्यांचे विचार समाजात रुजविण्याची, प्रत्येक घराघरात पोहोचविण्याची गरज आहे,’’ असे मत पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनी व्यक्त केले. 
खानवडी (ता. पुरंदर) येथे पंचायत समिती पुरंदर व  ग्रामपंचायतीतर्फे महात्मा जोतिराव फुले यांच्या 124व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गौरी कुंजीर  बोलत होत्या. 
या वेळी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी  सुवर्णा चव्हाण, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, उपसभापती अनिता कुदळे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, अंजना भोर, सरपंच चंद्रकांत फुले, सुनील धिवार, रवींद्र फुले, सीमा होले, नीलिमा बधे, बापू भोर, नीलेश जगताप, सुरेश मोरे, स्वाती दुर्गाडे, तानाजी झगडे, रोहिदास मेमाणो, गोरख मेमाणो, तानाजी फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सारिका इंगळे म्हणाल्या,‘‘महात्मा फुलेंनी त्या काळी दिलेले विचार हे समाजाचा उद्धार करणारे, तारणारे होते. त्यांनी त्या काळी आधुनिक शेतीचा मंत्र देत पाणी अडवा, पाणी जिरवा हा दिलेला विचार  प्रभावीपणो अवलंबला असता, तर आज दुष्काळ दिसला नसता. महात्मा फुलेंचा वारसा टिकविताना त्यांच्या कार्याचा वटवृक्ष झाला आहे. याचे जतन करायचे, त्यांची विचारधारा अखंडपणो तेवत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.’’
या वेळी दत्ता झुरंगे यांनीही विचार व्यक्त केले. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पध्रेतील प्रथम विजेत्या शिक्षिका स्वाती दुर्गाडे यांचे व्याख्यान झाले.
 प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत फुले यांनी, तर सूत्रसंचालन रवींद्र फुले यांनी केले. आभार चंद्रकांत टिळेकर यांनी मानले.