शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

प्रबोधनात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: May 15, 2016 00:30 IST

धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व देशपातळीवरचे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रारंभ

पिंपरी : धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व देशपातळीवरचे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रारंभ केल्याने त्यांना महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत डॉ. मोरे यांनी ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी आमदार लक्ष्मण जगताप व संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे विश्वस्त डॉ.अभय टिळक यांच्या हस्ते झाले. मिलिंद एकबोटे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, भाऊसाहेब भोईर, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, दत्ता वाघेरे आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले की, प्रबोधनाचे नाते आधुनिकतेशी आहे. प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांना त्रास झाला; मात्र त्यांनी माणसाला प्रतिष्ठेची जाणीव करून दिली. महाराष्ट्रात तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरमहाराज, संत नामदेवमहाराज यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. छत्रपती शिवरायांनी राजकीय व सांस्कृतिक प्रबोधन केले. ब्रिटिश काळात प्रबोधनाची गरज निर्माण झाली. बंगालनंतर महाराष्ट्रात प्रबोधनाची सुरुवात झाली. १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्राचा धर्मग्रंथ असलेल्या ज्ञानेश्वरीचे पहिले मुद्रण केले. संत साहित्यातून धार्मिक प्रबोधन केले. म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना प्रबोधनाचे जनक म्हणावे लागेल. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक हे धर्मसुधारक होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच भूमिका मांडली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकांनी केलेले राजकीय प्रबोधन याचा उल्लेख मोरे यांनी केला. आर्थिक व्यवस्था हा पाया असल्याचे सांगत मार्क्सवाद आला. कामगार संघटनेमार्फत आर्थिक प्रबोधन केले गेले. डॉ. आंबेडकरांनी धार्मिक, सामाजिक व राजकीय असे एकत्रित प्रबोधन केले. एकूणच महाराष्ट्राचे प्रबोधन संदर्भातील योगदान देशपातळीचे आहे. भारताचे नेतृत्व महाराष्ट्राकडे असले पाहिजे. मात्र, दुफळी, भाषेकडे दुर्लक्ष, इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव ही अडचण असल्याचे मोरे म्हणाले.आमदार जगताप व डॉ. टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. भोईर यांनी व्याख्यानमाला सुरु करताना आलेले अनुभव व्यक्त केले. (प्रतिनिधी)