शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

प्रबोधनात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: May 15, 2016 00:30 IST

धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व देशपातळीवरचे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रारंभ

पिंपरी : धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व देशपातळीवरचे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रारंभ केल्याने त्यांना महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत डॉ. मोरे यांनी ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी आमदार लक्ष्मण जगताप व संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे विश्वस्त डॉ.अभय टिळक यांच्या हस्ते झाले. मिलिंद एकबोटे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, भाऊसाहेब भोईर, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, दत्ता वाघेरे आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले की, प्रबोधनाचे नाते आधुनिकतेशी आहे. प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांना त्रास झाला; मात्र त्यांनी माणसाला प्रतिष्ठेची जाणीव करून दिली. महाराष्ट्रात तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरमहाराज, संत नामदेवमहाराज यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. छत्रपती शिवरायांनी राजकीय व सांस्कृतिक प्रबोधन केले. ब्रिटिश काळात प्रबोधनाची गरज निर्माण झाली. बंगालनंतर महाराष्ट्रात प्रबोधनाची सुरुवात झाली. १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्राचा धर्मग्रंथ असलेल्या ज्ञानेश्वरीचे पहिले मुद्रण केले. संत साहित्यातून धार्मिक प्रबोधन केले. म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना प्रबोधनाचे जनक म्हणावे लागेल. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक हे धर्मसुधारक होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच भूमिका मांडली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकांनी केलेले राजकीय प्रबोधन याचा उल्लेख मोरे यांनी केला. आर्थिक व्यवस्था हा पाया असल्याचे सांगत मार्क्सवाद आला. कामगार संघटनेमार्फत आर्थिक प्रबोधन केले गेले. डॉ. आंबेडकरांनी धार्मिक, सामाजिक व राजकीय असे एकत्रित प्रबोधन केले. एकूणच महाराष्ट्राचे प्रबोधन संदर्भातील योगदान देशपातळीचे आहे. भारताचे नेतृत्व महाराष्ट्राकडे असले पाहिजे. मात्र, दुफळी, भाषेकडे दुर्लक्ष, इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव ही अडचण असल्याचे मोरे म्हणाले.आमदार जगताप व डॉ. टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. भोईर यांनी व्याख्यानमाला सुरु करताना आलेले अनुभव व्यक्त केले. (प्रतिनिधी)