शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

देशासमोर ‘महाराष्ट्र पॅर्टन’ उभा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:10 IST

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य शासनाने असा निर्णय घेऊ ...

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य शासनाने असा निर्णय घेऊ नये. उलट यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची अधिक काळजी घ्यावी. तसेच कोरोनाच्या कठीण काळातही सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करून देशासमोर ‘महाराष्ट्र पॅर्टन’ उभा करावा, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्याचे जाहीर केले आहे. तसेच बारावीच्या परीक्षा जून महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे. परंतु , इयत्ता दहावीच्या परीक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, महाराष्ट्राने दहावी- बारावीच्या लेखी परीक्षा रद्द करू नयेत, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

सीबीएसईप्रमाणे महाराष्ट्र शासन इयत्ता दहावीच्या परीक्षाबाबत काहीही निर्णय घेऊ शकते. राज्य शासनाला तसे अधिकार आहेत. परंतु, परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर, सीबीएसईचे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांची कुठेच तुलना होऊ शकत नाही म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाबाबत सीबीएसईच्या मुलांसाठी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही तज्ञांकडून सांगितले जात आहे.

--

सीबीएसईने अत्यंत चुकीचा निर्णय घेतला असून याबाबत कोणत्याही राज्याला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना पात्र ठरवू नये. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. तसेच सीबीएसईप्रमाणे महाराष्ट्र शासनाने चुकीचा निर्णय घेऊ नये. दहावी-बारावी दोन्ही वर्षांतील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घ्याव्यात.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ

--

दहावी-बारावीच्या परीक्षा घेणे आवश्यक आहे. या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक काळजी घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्राने योग्य पद्धतीने परीक्षा घेऊन देशाला ‘महाराष्ट्र पॅर्टन’ दाखवून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेशादरम्यान नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यातील परीक्षा देणाऱ्या व परीक्षा न देणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी काही मर्यादित जागाच उपलब्ध करून द्याव्यात.

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ

--

सर्व प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे खूप मोठा अन्याय झालेला आहे. मात्र, परीक्षा जरी रद्द झाली तरी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या पातळीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जर नियमित परीक्षा होऊन चांगले गुण मिळाले असते तर वर्षभर मी जे केले ते योग्य होते. आयुष्यातील पहिली सार्वजनिक परीक्षा मी यशस्वी रित्या देऊ शकलो. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना मिळाला असता. परंतु, परीक्षा रद्द झाल्यामुळे ते यापासून वंचित मात्र नक्कीच राहिले आहेत.

- केदार टाकळकर, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व करिअर समुपदेशक