शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

देशासमोर ‘महाराष्ट्र पॅर्टन’ उभा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:10 IST

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य शासनाने असा निर्णय घेऊ ...

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य शासनाने असा निर्णय घेऊ नये. उलट यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची अधिक काळजी घ्यावी. तसेच कोरोनाच्या कठीण काळातही सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करून देशासमोर ‘महाराष्ट्र पॅर्टन’ उभा करावा, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्याचे जाहीर केले आहे. तसेच बारावीच्या परीक्षा जून महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे. परंतु , इयत्ता दहावीच्या परीक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, महाराष्ट्राने दहावी- बारावीच्या लेखी परीक्षा रद्द करू नयेत, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

सीबीएसईप्रमाणे महाराष्ट्र शासन इयत्ता दहावीच्या परीक्षाबाबत काहीही निर्णय घेऊ शकते. राज्य शासनाला तसे अधिकार आहेत. परंतु, परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर, सीबीएसईचे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांची कुठेच तुलना होऊ शकत नाही म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाबाबत सीबीएसईच्या मुलांसाठी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही तज्ञांकडून सांगितले जात आहे.

--

सीबीएसईने अत्यंत चुकीचा निर्णय घेतला असून याबाबत कोणत्याही राज्याला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना पात्र ठरवू नये. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. तसेच सीबीएसईप्रमाणे महाराष्ट्र शासनाने चुकीचा निर्णय घेऊ नये. दहावी-बारावी दोन्ही वर्षांतील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घ्याव्यात.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ

--

दहावी-बारावीच्या परीक्षा घेणे आवश्यक आहे. या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक काळजी घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्राने योग्य पद्धतीने परीक्षा घेऊन देशाला ‘महाराष्ट्र पॅर्टन’ दाखवून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेशादरम्यान नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यातील परीक्षा देणाऱ्या व परीक्षा न देणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी काही मर्यादित जागाच उपलब्ध करून द्याव्यात.

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ

--

सर्व प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे खूप मोठा अन्याय झालेला आहे. मात्र, परीक्षा जरी रद्द झाली तरी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या पातळीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जर नियमित परीक्षा होऊन चांगले गुण मिळाले असते तर वर्षभर मी जे केले ते योग्य होते. आयुष्यातील पहिली सार्वजनिक परीक्षा मी यशस्वी रित्या देऊ शकलो. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना मिळाला असता. परंतु, परीक्षा रद्द झाल्यामुळे ते यापासून वंचित मात्र नक्कीच राहिले आहेत.

- केदार टाकळकर, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व करिअर समुपदेशक