शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

साखरेच्या निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखर निर्यातीच्या ६० लाख टन मर्यादेपैकी यंदा आतापर्यंत ४३ लाख टनांचे करार झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखर निर्यातीच्या ६० लाख टन मर्यादेपैकी यंदा आतापर्यंत ४३ लाख टनांचे करार झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचा वाटा २२ टक्के आहे. देशातील साखरेचे उत्पादन व खप यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा अशी मागणी साखर महासंघाने केली आहे.

साखर अतिरिक्त होण्याची शक्यता लक्षात घेऊनच केंद्र सरकारने देशातील साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीकडे वळवण्याचे धोरण घेतले आहे. त्यासाठी लागणारे प्रकल्प उभे करण्यासाठी कारखान्यांना कर्जावर व्याजाचे अनुदान दिले आहे. त्याचबरोबर दरवर्षी साखरेच्या उत्पादनात १० टक्के कपात करून तो उस इथेनॉलकडे वळवण्याची सूचनाही दिली आहे.

त्याप्रमाणे १० टक्के उत्पादन कमी करूनही राज्यात यंदा साखर उत्पादन जास्त असल्याचे महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीबरोबरच केंद्र सरकारने साखर निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा, त्याशिवाय सहकारी साखर कारखानदारीवरील आर्थिक अरिष्ट दूर होणार नसल्याचे ते म्हणाले.

यावर्षी निर्यातीसाठी ६० लाख टन कोटा निश्चित करण्यात आला. एक किलोमागे ६ रूपये अनुदान जाहीर झाले. मात्र प्रत्येक कारखान्याला साखर निर्यातीची मर्यादाही आहे. ती वाढवणे गरजेचे असल्याचे दांडेगावकर म्हणाले. महासंघाच्या माध्यमातून केंद्रीय अन्न मंत्रालय, व्यापार मंत्रालय, अर्थ मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयाबरोबर सातत्याने याविषयी पाठपुरावा होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय स्तरावरून साखरेच्या वाढीव दराचा (एमएसपी) निर्णय होणेही गरजेचे आहे. उस दर व साखर दर याचा मेळ बसल्याशिवाय साखर उद्योगासमोरील समस्या कायमस्वरूपी दूर होणार नाहीत. याबाबत केंद्रात संबधित मंत्रालयांची ६ एप्रिलला बैठक असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

साखर उद्योगासमोरचे संकट ओळखून केंद्र सरकार देश पातळीवर २० लाख टनाचा अतिरिक्त कोटा दोन भागात देण्याचा विचार करत असल्याचे समजते.

चौकट

खप झाला कमी

देशातील साखरेचा खप प्रतिवर्षी २५० ते २६० लाख टन इतका असतो. त्यात यापूर्वी दरवर्षी ४.१ टक्क्यांनी वाढ व्हायची. पण साखर खाण्याबाबत जागरूकता वाढल्याने ही वाढ पूर्ण थांबली आहे. त्यातूनच साखरेचा खप कमी झाला आहे.