शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखर निर्यातीच्या ६० लाख टन मर्यादेपैकी यंदा आतापर्यंत ४३ लाख टनांचे करार झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखर निर्यातीच्या ६० लाख टन मर्यादेपैकी यंदा आतापर्यंत ४३ लाख टनांचे करार झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचा वाटा २२ टक्के आहे. देशातील साखरेचे उत्पादन व खप यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा अशी मागणी साखर महासंघाने केली आहे.

साखर अतिरिक्त होण्याची शक्यता लक्षात घेऊनच केंद्र सरकारने देशातील साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीकडे वळवण्याचे धोरण घेतले आहे. त्यासाठी लागणारे प्रकल्प उभे करण्यासाठी कारखान्यांना कर्जावर व्याजाचे अनुदान दिले आहे. त्याचबरोबर दरवर्षी साखरेच्या उत्पादनात १० टक्के कपात करून तो उस इथेनॉलकडे वळवण्याची सूचनाही दिली आहे.

त्याप्रमाणे १० टक्के उत्पादन कमी करूनही राज्यात यंदा साखर उत्पादन जास्त असल्याचे महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीबरोबरच केंद्र सरकारने साखर निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा, त्याशिवाय सहकारी साखर कारखानदारीवरील आर्थिक अरिष्ट दूर होणार नसल्याचे ते म्हणाले.

यावर्षी निर्यातीसाठी ६० लाख टन कोटा निश्चित करण्यात आला. एक किलोमागे ६ रूपये अनुदान जाहीर झाले. मात्र प्रत्येक कारखान्याला साखर निर्यातीची मर्यादाही आहे. ती वाढवणे गरजेचे असल्याचे दांडेगावकर म्हणाले. महासंघाच्या माध्यमातून केंद्रीय अन्न मंत्रालय, व्यापार मंत्रालय, अर्थ मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयाबरोबर सातत्याने याविषयी पाठपुरावा होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय स्तरावरून साखरेच्या वाढीव दराचा (एमएसपी) निर्णय होणेही गरजेचे आहे. उस दर व साखर दर याचा मेळ बसल्याशिवाय साखर उद्योगासमोरील समस्या कायमस्वरूपी दूर होणार नाहीत. याबाबत केंद्रात संबधित मंत्रालयांची ६ एप्रिलला बैठक असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

साखर उद्योगासमोरचे संकट ओळखून केंद्र सरकार देश पातळीवर २० लाख टनाचा अतिरिक्त कोटा दोन भागात देण्याचा विचार करत असल्याचे समजते.

चौकट

खप झाला कमी

देशातील साखरेचा खप प्रतिवर्षी २५० ते २६० लाख टन इतका असतो. त्यात यापूर्वी दरवर्षी ४.१ टक्क्यांनी वाढ व्हायची. पण साखर खाण्याबाबत जागरूकता वाढल्याने ही वाढ पूर्ण थांबली आहे. त्यातूनच साखरेचा खप कमी झाला आहे.