शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत महाराष्ट्र देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कितीही टीका करो, पण त्यांच्या पदाच्या नावे असणाऱ्या पंतप्रधान किसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कितीही टीका करो, पण त्यांच्या पदाच्या नावे असणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. हा क्रमांक लाभार्थी संख्येच्या स्तरावर तर आहेच, शिवाय सर्वाधिक लाभार्थ्यांची पाहणी करण्यासाठीही आहे.

यानिमित्त राज्याच्या कृषिमंत्र्यांचा थेट राजधानी दिल्लीत गौरव होणार आहे. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर झाली. या योजनेत शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २ हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात वर्षभरात ६ हजार रूपये जमा होतात.

आतापर्यंत २ वर्षांमध्ये या योजनेतंर्गत राज्यात १ कोटी १४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ११ हजार ६३३ कोटी रूपये जमा केले आहेत. देशातील एका राज्याची ही सर्वाधिक लाभार्थी संख्या आहे.

यापैकी ५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने राज्याकडे ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची नावे पाठवली. सरकारी यंत्रणेने त्यातील ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. अशी तपासणी करणारेही महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

या योजनेंतर्गत राज्यात ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यातील तब्बल २३ हजार ६३२ तक्रारींचा समाधानकारक निपटारा केला. असे करणारेही महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. या तिन्ही कामगिऱ्यांबद्दल केंद्र सरकारच्या वतीने राज्याचा व निवडक जिल्ह्यांचा दिल्लीत २४ फेब्रुवारीला केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करणार आहे.

कोट

राज्याच्या कृषी खात्यासाठी ही मोठीच सन्मानाची गोष्ट आहे. कृषी विभाग तसेच अन्य सरकारी यंत्रणांनी या योजनेसाठी जोमाने काम केल्यामुळेच हे शक्य झाले.

- विनयकुमार आवटे, पीएम किसान प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख