शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maharashtra Election 2019 : खेड तालुक्यातील जनता थापांना भुलणार नाही : सुरेश गोरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:20 IST

शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आता नागरिकांसाठी पश्चात्ताप बनला आहे.

खेड :  तालुक्यातील जनतेने दहा वर्षांत खूप काही सहन केले़. तालुक्यातील जनतेला अक्षरश: लुटले; तेच आता मतांसाठी गयावया करत फिरत आहेत.या गुंडांच्या राजकारणाला जनता आता कंटाळली आहे़. त्यामुळे कोणीतीही स्वप्ने दाखवली तरी इथली जनता भूलथापांना बळी पडणार नाही़. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुरेशे गोरे यांनी व्यक्त केला़. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचाराचा नारळ निमगाव (ता. खेड) येथे श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरात माजी खासदार शिवराजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला़ या वेळी  बाबाजी काळे, संतोष डोळस,  शिवाजी वर्पे, विजया शिंदे, सुभद्रा शिंदे, भगवान पोखरकर, ज्योती आरगडे, सुनीता सांडभोर, रूपाली कड, अंकुश राक्षे, अमर कांबळे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, विजयसिंह शिंदे पाटील, किरण मांजरे, सूर्यकांत मुंगसे, अशोक खांडेभराड, सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, नंदा कड, माऊली कटके आदीउपस्थित होते़ शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आता नागरिकांसाठी पश्चात्ताप बनला आहे. राष्ट्रवादी पक्षाची आता वाताहत झाली आहे. पुणे व पिंपरी परिसरात घड्याळ घेता का घड्याळ इतकी वाईट परिस्थिती आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जनतेने आता सेना-भाजपला साथ दिली पाहिजे.  यावेळी माऊली कटके,अशोक खांडेभराड आदींची भाषणे झाली........मित्रपक्षाचा तांडा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी असले तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल. ज्याने दहा वर्षांत जनतेला त्रास दिला त्याला निवडून आणायचे आहे का? असा सवाल करीत आमचे नाणे खणखणीत आहे. खेड तालुक्याचा विकास आमदार सुरेश गोरे यांनी केला असून, तेच पुन्हा बहुमताने निवडून येतील, असा विश्वासही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला़. ..........

टॅग्स :KhedखेडPoliticsराजकारणShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावElectionनिवडणूक