शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महाप्रलयाची आज साठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहातो. मग ज्यांनी अशा महासंकटांपैकी एखाद्या जरी संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल? अशाच एका महासंकटात पुणे शहर १२ जुलै १९६१ या दिवशी सापडले होते. पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात हाहाकार उडाला तो सांगायला अनेकांचे शब्दच अपुरे पडतात. सोमवारी (दि. १२) या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत... तो दिवस आजही विसरू शकत नाही....अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागविल्या.

मी त्या वेळी दुसरीत होतो. नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ पाटणकरांच्या वाड्यात आम्ही राहात होतो. रस्त्यालगत आमचं घर होतं. सध्याच्या कोतवालवाडा (पूर्वी जिथं विष्णुशास्त्री चिपळूणकर राहत असत) त्यांच्यासमोर आमचा वाडा. तो दिवस उजाडला नेहमीसारखाच. पण नियतीनं दुसरंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. त्या दिवशी आमच्या घरी मी आई, माझी दोन भावंडं होती. तसेच आत्या, काका वगैरे पाहुणे आले होते. वडील नोकरीनिमित्त मुंबईला होते. सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पानशेत धरण फुटले व धरणातून पाणी वाढू लागलं. अशा बातम्या येऊ लागल्या. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितलं. नंतर पाणी वाढू लागलं अशा बातम्या यायला लागल्या. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितले. नंतर पाणी वेगानं लकडी पुलावरून वाहू लागलं व म्हणता म्हणता नारायण पेठेपर्यंत आलं. जनसमुदाय आम्हाला घराबाहेर जा असं सांगत होता. आई स्वयंपाक करीत होती. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. परंतु काकाच्या मदतीने आम्ही सर्व जोगेश्वरी मंदिराजवळ राहणाऱ्या आजीकडे गेलो आणि सुखरूप राहिलो. दुसऱ्या दिवशी घरी येऊन पाहतो तर घरात पाणी आल्याचं दिसलं. आई करीत असलेल्या पोळ्या चिखलात रुतून बसल्या होत्या. सगळीकडे चिखल झाला होता. वह्या, पुस्तकं, धान्य, भांडीकुंडी सर्वच खराब झालं होतं. मुंबईच्या पेपरामधील बातमी वाचून वडील पुण्याला आले. पुराची आठवण आजही ताजी आहे. त्याची आठवण आल्यानंतर अंगावर शहारे येतात... अशी आठवण माधव ताटके यांनी सांगितली.

-----------------------------

मी त्या वेळी आठवीत होतो. शाळेत असतानाच आम्हाला पूर आल्याचे सांगण्यात आले आणि शाळा सोडून देण्यात आली. माती गणपतीजवळ घर असल्याने तिथे गेल्यावर गुडघाभर पाणी झाले होते. चुलत्यांनी मला पाहिल्यानंतर मावशीकडे पाठविले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मावशीने आम्हा सर्वांना उठवले आणि पर्वतीवर पाठवले. पुन्हा धरण फुटले आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पाणी येणार अशी अफवा पसरली. त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत, अशा स्मृती प्रा. प्र. के. घाणेकर यांनी जागविल्या.

-----------------------------