शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

माफियागिरी हेच राज्य सरकारचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना वसुली करणारा माणूस हवा होता. वाझे त्यांच्या विश्वासातला माणूस, जुना शिवसैैनिक, त्यामुळे त्याच्या बचावासाठी सरकार पुढे सरसावले,” असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला.

“सचिन वाझेसारख्या एका साध्या पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी अजय मेहता यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालावर उध्दव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सह्या केल्या. जून २०२० मध्ये कडक लॉकडाऊन सुरु असताना सचिन वाझेचे १७ वर्षांचे निलंबन रद्द करुन त्याला परत कामावर रुजू करुन घेण्यात आले. सरकार याबाबतीत अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. उध्दव ठाकरेंनी ‘मी बेजबाबदार’चा बोर्ड गळयात घातला पाहिजे,” अशी टीका सोमय्या यांनी केली. पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सोमवारी (दि. १५) ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, २००४ मध्ये सचिन वाझेचे निलंबन झाले तेव्हा राज्याचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. नोव्हेंबर २००७ मध्ये त्याची याचिका फेटाळण्यात आली आणि राजीनामा द्यावा लागला, त्यावेळीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होते. मग २०२० मध्ये गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असतानाच अनिल देशमुखांना असा काय शोध लागला की, त्यांनी सचिन वाझेचा बचाव केला, असा प्रश्न सोमय्या यांनी केला.

चौकट

वाझेेचे विशेष काम कोणते?

एक सहाय्यक पोलीस निरिक्षक गुन्हे शाखेची गाडी घेऊन फिरतो आणि पोलीस महासंचालक परमवीर सिंग तीन दिवस त्याच्याशी काय ‘गुफ्तगू’ करतात? याचाच अर्थ सचिन वाझे त्याांचा विशेष कामाचा विशेष माणूस आहे. ते काम काय, हे आता जगाच्या समोर आले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

चौकट

सरकारकडे नाही कृती आराखडा

‘ससून’ रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था चांगली आहे. मात्र, मुंबई आणि इतर काही शहरात ठाकरे सरकारने विक्षिप्त नियोजन करुन ठेवले आहे. सरकारने लसीकरणाच्या केंद्रीकरणाचा घाट घातला आहे. एकेका केंद्रावर साडेचार-पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना बोलावले जाते. कोरोना पुन्हा अचानक वाढू लागला मात्र, तो का वाढतो याबाबत महाराष्ट्र सरकारने अभ्यासच केलेला नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीचा कोणताही कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.