शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

माफियागिरी हेच राज्य सरकारचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना वसुली करणारा माणूस हवा होता. वाझे त्यांच्या विश्वासातला माणूस, जुना शिवसैैनिक, त्यामुळे त्याच्या बचावासाठी सरकार पुढे सरसावले,” असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला.

“सचिन वाझेसारख्या एका साध्या पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी अजय मेहता यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालावर उध्दव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सह्या केल्या. जून २०२० मध्ये कडक लॉकडाऊन सुरु असताना सचिन वाझेचे १७ वर्षांचे निलंबन रद्द करुन त्याला परत कामावर रुजू करुन घेण्यात आले. सरकार याबाबतीत अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. उध्दव ठाकरेंनी ‘मी बेजबाबदार’चा बोर्ड गळयात घातला पाहिजे,” अशी टीका सोमय्या यांनी केली. पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सोमवारी (दि. १५) ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, २००४ मध्ये सचिन वाझेचे निलंबन झाले तेव्हा राज्याचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. नोव्हेंबर २००७ मध्ये त्याची याचिका फेटाळण्यात आली आणि राजीनामा द्यावा लागला, त्यावेळीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होते. मग २०२० मध्ये गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असतानाच अनिल देशमुखांना असा काय शोध लागला की, त्यांनी सचिन वाझेचा बचाव केला, असा प्रश्न सोमय्या यांनी केला.

चौकट

वाझेेचे विशेष काम कोणते?

एक सहाय्यक पोलीस निरिक्षक गुन्हे शाखेची गाडी घेऊन फिरतो आणि पोलीस महासंचालक परमवीर सिंग तीन दिवस त्याच्याशी काय ‘गुफ्तगू’ करतात? याचाच अर्थ सचिन वाझे त्याांचा विशेष कामाचा विशेष माणूस आहे. ते काम काय, हे आता जगाच्या समोर आले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

चौकट

सरकारकडे नाही कृती आराखडा

‘ससून’ रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था चांगली आहे. मात्र, मुंबई आणि इतर काही शहरात ठाकरे सरकारने विक्षिप्त नियोजन करुन ठेवले आहे. सरकारने लसीकरणाच्या केंद्रीकरणाचा घाट घातला आहे. एकेका केंद्रावर साडेचार-पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना बोलावले जाते. कोरोना पुन्हा अचानक वाढू लागला मात्र, तो का वाढतो याबाबत महाराष्ट्र सरकारने अभ्यासच केलेला नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीचा कोणताही कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.