शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

माफियागिरी हेच राज्य सरकारचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना वसुली करणारा माणूस हवा होता. वाझे त्यांच्या विश्वासातला माणूस, जुना शिवसैैनिक, त्यामुळे त्याच्या बचावासाठी सरकार पुढे सरसावले,” असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला.

“सचिन वाझेसारख्या एका साध्या पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी अजय मेहता यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालावर उध्दव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सह्या केल्या. जून २०२० मध्ये कडक लॉकडाऊन सुरु असताना सचिन वाझेचे १७ वर्षांचे निलंबन रद्द करुन त्याला परत कामावर रुजू करुन घेण्यात आले. सरकार याबाबतीत अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. उध्दव ठाकरेंनी ‘मी बेजबाबदार’चा बोर्ड गळयात घातला पाहिजे,” अशी टीका सोमय्या यांनी केली. पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सोमवारी (दि. १५) ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, २००४ मध्ये सचिन वाझेचे निलंबन झाले तेव्हा राज्याचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. नोव्हेंबर २००७ मध्ये त्याची याचिका फेटाळण्यात आली आणि राजीनामा द्यावा लागला, त्यावेळीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होते. मग २०२० मध्ये गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असतानाच अनिल देशमुखांना असा काय शोध लागला की, त्यांनी सचिन वाझेचा बचाव केला, असा प्रश्न सोमय्या यांनी केला.

चौकट

वाझेेचे विशेष काम कोणते?

एक सहाय्यक पोलीस निरिक्षक गुन्हे शाखेची गाडी घेऊन फिरतो आणि पोलीस महासंचालक परमवीर सिंग तीन दिवस त्याच्याशी काय ‘गुफ्तगू’ करतात? याचाच अर्थ सचिन वाझे त्याांचा विशेष कामाचा विशेष माणूस आहे. ते काम काय, हे आता जगाच्या समोर आले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

चौकट

सरकारकडे नाही कृती आराखडा

‘ससून’ रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था चांगली आहे. मात्र, मुंबई आणि इतर काही शहरात ठाकरे सरकारने विक्षिप्त नियोजन करुन ठेवले आहे. सरकारने लसीकरणाच्या केंद्रीकरणाचा घाट घातला आहे. एकेका केंद्रावर साडेचार-पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना बोलावले जाते. कोरोना पुन्हा अचानक वाढू लागला मात्र, तो का वाढतो याबाबत महाराष्ट्र सरकारने अभ्यासच केलेला नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीचा कोणताही कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.