शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांनी उलगडले पुलंच्या विनोदामागचे अंतरंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 21:39 IST

मनुष्याच्या आयुष्यात विनोद नसेल तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. पुलं हा 'खेळीया' नव्हता तर माणसं जमवणारा 'मेळीया' होता.

पुणे : मनुष्याच्या आयुष्यात विनोद नसेल तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. पुलं हा 'खेळीया' नव्हता तर माणसं जमवणारा 'मेळीया' होता. पुलंनी हसविण्याबरोबरच लोकांना रडविले, विचार आणि अंतर्मुख करायला लावले. पुलंच्या विनोदाने सामान्य माणसांशी हस्तांदोलन केले. विनोदाच्या अस्त्राचा त्यांनी शस्त्र म्हणून वापर केला अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी पुलंच्या विनोदामागचे अंतरंग उलगडले.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु.ल परिवार आणि आशय सांस्कृतिक च्या वतीने आयोजित 'ग्लोबल पुलोत्सव 'चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ अरुणा ढेरे, तसेच मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ सतीश देसाई, आशय सांस्कृतिक चे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, , मयूर वैद्य आणि नायनीश देशपांडे उपस्थित होते. यावेळी 'ग्लोबल पुलोत्सव' च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. चौदा वर्षांच्या पुलोत्सवावर ' मागोवा' या साकारल्या जात असलेल्या लघुपट निर्मितीचा शुभारंभ डॉ. ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला.माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तकाला पुलंची प्रस्तावना होती. मला त्यांचा प्रसादस्पर्श लाभला. त्या बळावर माझी साठ वर्षांची वाटचाल झाली असे सांगून मधु मंगेश कर्णिक म्हणाले, महाराष्ट्राला विनोद तसा नवीन नाही भारूड अभंग यातून उपरोधिक भाष्य अनुभवले आहे. कोल्हटकर, चि. वि. जोशी यांनी विनोदातून लोकांना हसविले, पण पुलंच्या विनोदाने सामान्य माणसांशी हस्तांदोलन केले. पुलंनी महाराष्ट्राला विनोदाचा प्रसाद दिला त्यामागे त्यांची एक भूमिका होती त्यांनी हसवलं, रडवलं आणि अंतर्मुखही केले. कारण विनोदाचे देखील एक शास्त्र आहे. पुलंच्या विनोदात, स्वभावात सामाजिक मन दडले होते. विनोदाच्या पलीकडे जाऊन पुलंना ओळखण्याची गरज आहे. ते विदुषी नाहीत विचारवंत आहेत, मात्र त्यांच्या विनोदाची चिकित्सा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला समृद्ध केले. पुलंनी रसिकांना अभिरुची संपन्नता दिली. मराठी माणसाची नजर त्यांनी भारतातील कलावंता पर्यंत पोहोचविली. वाड्मयीन चळवळी, युद्ध नाही, कधी कला व वाड्मयबाह्य गोष्टी केल्या नाहीत तरीही ते कलाजीवनाचे दिग्दर्शक ठरले. ओबडधोबड दगड असलेल्या मराठी माणसाला पुलंनी हसवायला शिकविले दोन्ही हात पसरून कलेच्या सर्व गोष्टीचे त्यांनी भरभरून स्वागत केले. निरमत्सरी, उदारमतवादी जीवन जगणे फार कमी लोकांना जमते, त्यातील पु.ल एकमेव होते. पुलंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मुक्ता टिळक यांनी दिली. त्या म्हणाल्या, पुलंच्या मालती माधव या निवासस्थानी पुलंच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ असा नीलफलक लावण्यात आला आहे. चित्रपट, साहित्य, संगीत या पैकी एका क्षेत्रासाठी पुलं देशपांडे पुरस्कार दिला जाणार आहे. ही एक सांस्कृतिक चळवळ आहे ती पुढे नेणे आपली जबाबदारी असल्यामुळे पुलोत्सवाला महापालिकेतर्फे 3 लाख रुपये दिले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल.कोकण साहित्य परिषद ज्या व्यक्तीला अध्यक्षपद देते तोच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो अशी मिश्कील टिप्पणी मधु मंगेश कर्णिक यांनी केली. साहित्य संमेलन निवडणुकीवरही त्यांनी ताशेरे ओढले. बँक, पतपेढी, साखर कारखान्यांची निवडणूक होऊ द्या साहित्य संमेलन अध्ययक्षाची कसली निवडणूक घेता? लता मंगेशकर की किशोरी आमोणकर किंवा भीमसेन जोशी की कुमार गंधर्व हे मतदान घेऊन कसे ठरवणार? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सन्मानानेच निवडला जायला हवा. साहित्य संमेलन हा शारदेचा देव्हारा आहे. तीस वर्षे संमेलन पाहतो आहे आज माझ्या मनासारखे संमेलन होणार आहे याचा आनन्द आहे.एका शारदेच्या देव्हारयात सात्विक सरस्वतीच प्रतिष्ठापना झाली असल्याचे ते म्हणाले.