शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

माझा दृष्टिकोन बदलला : किरण राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:25 IST

गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली.

पुणे, दि. 27 - गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली. लोक किती वर्ष दुष्काळ सहन करीत आहेत, पाण्याअभावी त्यांचे किती हाल होत आहेत, हे ऐकल्यानंतर मन हेलावून गेले. या परिस्थितीतही पाणीप्रश्नावर एकत्रित येऊन चांगलं काहीतरी घडवण्याची त्यांची इच्छा आहे, हीच त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह पाहिल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना पाणी फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि दिग्दर्शिका किरण राव यांनी व्यक्त केली.प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने एका मुलाखतीमध्ये देशातील असहिष्णुतेचे वातावरण पाहून पत्नी किरण राव हिला देश सोडून जावे का? असे वाटत असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले होते. समाजासह सोशल मीडियावर त्याच्या या विधानावर टीकेची झोड उठली होती. या पाश् भूमीवर किरण राव यांना विचारलेल्या प्रश्नावर  माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे सूचकपणे सांगत या वादाला एकप्रकारे पूर्णविराम दिला. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावांना भेटी देताना आलेले अनुभव कथन केले. सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेच्या माध्यमातून  ‘तुफान आलिया’ हा शो सुरू करण्यात आला होता. स्पर्धेच्या 45 दिवसांच्या कालावधीत केवळ स्टुडिओमध्ये बसून यावर चर्चा न घडविता आमीर आणि किरण यांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे वार्तांकन केले होते, त्या अनुभवाविषयी सांगताना किरण राव म्हणाल्या गावातील लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यांचे प्रश्न सांगितले तेव्हा ख-या अर्थाने मनाची कवाडे खुली झाली. लोकचळवळीतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासंबंधीची माहिती लोकांना दिली तेव्हा या चळवळीबददल लोकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली. कितीतरी गावांमध्ये महिला घराचा उंबरठा ओलांडू शकल्या नव्हत्या. खिडकीतूनच घरी आलेल्या पाहुण्यांना पाहाण्याची त्यांना मुभा होती, पण या चळवळीमुळे त्यांना घरातून बाहेर पडण्यास  प्रोत्साहन मिळाले. या चळवळीत सहभागी होण्यासाठी एका मुलीने आपले लग्न पुढे ढकलले. सकारात्मकतेचे जग एकेक गाव व्यापत चालले असल्याचे पाहायला मिळाले, एका प्रश्नासाठी लोकशक्ती एकत्र येऊ शकते या उत्साहामुळेच माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.