शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

माझा दृष्टिकोन बदलला : किरण राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:25 IST

गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली.

पुणे, दि. 27 - गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली. लोक किती वर्ष दुष्काळ सहन करीत आहेत, पाण्याअभावी त्यांचे किती हाल होत आहेत, हे ऐकल्यानंतर मन हेलावून गेले. या परिस्थितीतही पाणीप्रश्नावर एकत्रित येऊन चांगलं काहीतरी घडवण्याची त्यांची इच्छा आहे, हीच त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह पाहिल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना पाणी फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि दिग्दर्शिका किरण राव यांनी व्यक्त केली.प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने एका मुलाखतीमध्ये देशातील असहिष्णुतेचे वातावरण पाहून पत्नी किरण राव हिला देश सोडून जावे का? असे वाटत असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले होते. समाजासह सोशल मीडियावर त्याच्या या विधानावर टीकेची झोड उठली होती. या पाश् भूमीवर किरण राव यांना विचारलेल्या प्रश्नावर  माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे सूचकपणे सांगत या वादाला एकप्रकारे पूर्णविराम दिला. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावांना भेटी देताना आलेले अनुभव कथन केले. सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेच्या माध्यमातून  ‘तुफान आलिया’ हा शो सुरू करण्यात आला होता. स्पर्धेच्या 45 दिवसांच्या कालावधीत केवळ स्टुडिओमध्ये बसून यावर चर्चा न घडविता आमीर आणि किरण यांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे वार्तांकन केले होते, त्या अनुभवाविषयी सांगताना किरण राव म्हणाल्या गावातील लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यांचे प्रश्न सांगितले तेव्हा ख-या अर्थाने मनाची कवाडे खुली झाली. लोकचळवळीतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासंबंधीची माहिती लोकांना दिली तेव्हा या चळवळीबददल लोकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली. कितीतरी गावांमध्ये महिला घराचा उंबरठा ओलांडू शकल्या नव्हत्या. खिडकीतूनच घरी आलेल्या पाहुण्यांना पाहाण्याची त्यांना मुभा होती, पण या चळवळीमुळे त्यांना घरातून बाहेर पडण्यास  प्रोत्साहन मिळाले. या चळवळीत सहभागी होण्यासाठी एका मुलीने आपले लग्न पुढे ढकलले. सकारात्मकतेचे जग एकेक गाव व्यापत चालले असल्याचे पाहायला मिळाले, एका प्रश्नासाठी लोकशक्ती एकत्र येऊ शकते या उत्साहामुळेच माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.