शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

ढेकूळही फुटेना, खरीप हंगाम धोक्यात

By admin | Updated: July 15, 2014 04:07 IST

हंगामी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केलेल्या शेतीच्या नांगरणीची ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत.

रांजणगाव गणपती : हंगामी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केलेल्या शेतीच्या नांगरणीची ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत. पेरणीअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसू लागल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. नक्षत्राप्रमाणे ढोबळपणाने सात जूनला सुरू होणारा हंगामी पाऊस जुलै महिना अर्ध्यावर आला तरी अजून बरसत नसल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ निर्माण होऊ लागली आहे. सतत दुष्काळच्या छायेत गणला जाणारा शिरूर तालुका चासकमान, डिंभे धरणाच्या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम होत असला तरी निसर्गातील पावसाच्या सरी बरसल्याशिवाय भूजल पातळी वाढत नाही. वेळेवर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना वर्षभराचे शेतीचे नियोजन करणे सोयीचे जाते. शेतीत विविध पिके घेऊन निघालेल्या उत्पादनातून वर्षभराचे आर्थिक नियोजन करता येते. आता मात्र पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षी खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नातून पुढील हंगामातील पिकांचे बी बियाणे, खते, पिकांवरील औषधे, शेतमजुरी भागविता येते. परंतु, या वर्षी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडून गेले आहे. कोकण आणि मुंबईत पाऊस पडत आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.